बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०१४ पासूनचे ४२ बुडीत खाते धारकांचे ११,२०४.१० कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण खातेधारकांची नावे विचारली असता त्यावर मौन पाळले. तसेच आर्थिक वर्ष १३-१४ या वर्षातील बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली २५४८.१३ कोटींची रक्कम माफ केली आहे. गेल्या ९ वर्षात मोठे खातेधारक आणि लहान खातेधारकांकडून बँकेला फक्त १५% पेक्षा कमी रक्कम वसूल करता आली आहे. मोठे खातेधारक ज्यांनी १०० करोड पेक्षा जास्त पैसे थकवलेले आहेत आणि लहान खातेधारक ज्यांच्याकडून १० करोड किंवा त्यापेक्षा कमी येणी बाकी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे भाग धारक श्री.…
Read MoreDay: July 26, 2022
अन्न आणि पोषण सर्वेक्षणात ओडिशाचा पहिला क्रमांक !
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राज्यातील क्रमवारी जाहीर करण्यात आली असून ओडिशा त्यात सामान्य श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्रिपुरा विशेष श्रेणीत आले आहे. सामान्य श्रेणीत ओडिशानंतर उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश , गुजरात या राज्यांचा समावेश आहे. तर विशेष श्रेणीत ईशान्येकडील राज्य, हिमालयातील राज्य आणि बेटांचा समावेश होतो. त्रिपुरा नंतर हिमाचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम यांचा या यादीत समावेश आहे. ही क्रमवारी राज्यांनी त्यांच्याकडील अन्नाचे वितरण, प्रक्रिया यांच्या दिलेल्या माहितीनुसार दिली आहे. या क्रमवारीचा उद्देश हा की कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी. ही क्रमवारी पहिल्यांदाच काढण्यात आली आहे.…
Read More