जो चित्रपट ‘दुसरा इतिहास’ घडवेल अशा अपेक्षा होत्या, तोही शेवटी ‘वन लायनर’ च ठरला. काही वर्षांपूर्वी शाळेत असताना आम्हाला निबंधाचे विषय असायचे. ‘अमुक एक व्यक्ती आज जिवंत असती तर’ किंवा ‘तमुक व्यक्ती भूतकाळातून भविष्यकाळात आली तर तिच्या आजच्या जगाबद्दलच्या काय कल्पना असतील ‘वैगरे वैगरे. आणि ती व्यक्ती खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभी आहे अशी कल्पना करून आम्ही निबंध लिहायचो. असे विषय शाळेमध्ये निबंध लेखनासाठी असल्यामुळे तशाच पद्धतीचा विचार करण्याची सवय लागली होती. असाच एके दिवशी एक विचार माझ्या मनात आला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींवर श्री नथुराम विनायक गोडसे यांनी केलेल्या…
Read More