५५ वर्षात फक्त ३ होकार || भारतातून अधिकृतपणे ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेल्या चित्रपटांना कधीतरीच ऑस्करचे नामांकन का मिळते?

गेल्या ५५ वर्षात भारतातून जे चित्रपट ऑस्कर वारीसाठी पाठवले गेले त्यातल्या फक्त ३ चित्रपटांचीच ऑस्कर साठी का निवड झाली? खरेतर सगळेच चित्रपट भारतातच काय पण परदेशातही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. पण मग तरी असे का व्हावे? हे असेच जर सुरु राहिले तर ऑस्करच्या निवडचाचणीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील हे नक्की…

ऑस्करच्या यादीतील ३ चित्रपट कोणते? नर्गिस सुनीलदत्त अभिनित मदर इंडिया (१९५७), मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे (१९८८) आणि अमीर खानचा लगान (२००१). या वर्षी ज्या चित्रपटांची निवड झाली ते आहेत, चेल्लो शो. नलीन कुमार पंड्या म्हणजे पॅन नलीन यांचा गुजराती चित्रपट. जर्मन जागतिक युद्ध १ वर आधारित असलेला ‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’ आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेता अर्जेंटिना १९८५ ( एक ऐतिहासिक नाटक ज्यात अर्जेंटिना मधील काही वकील दक्षिण अमेरिकेतील जूनटा सैन्याविरोधात लढताना दाखवले आहेत.)

ऑस्कर पुरस्कारांसाठी चित्रपटांची अधिकृत निवड फिल्म फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी नेमलेल्या समितीद्वारे करण्यात आली. ही चित्रपट निर्मात्यांची संस्था आहे. पण काय ही संस्था योग्य चित्रपटांची निवड करते आहे? की ही संस्था फक्त अशा चित्रपटांना पाठिंबा देते ज्यांचे बजेट ऑस्कर च्या नामांकनासाठी योग्य आहे. RRR हा यावर्षीचा सर्वात गाजलेला चित्रपट ठरला. पण चित्रपटाला पुरस्कार देण्यासाठी बाफ्टाने नकार दिला आहे. चित्रपटाला थिएटर आणि वितरण कंपनीचा पाठिंबा असून सुद्धा त्यातील फक्त नाटु नाटु गाण्याला पुरस्कार मिळाला. त्यासाठी त्यांना ८० कोटी रुपये मोजावे लागले. आता आपण निदान असे तरी म्हणू शकतो की RRR चित्रपटातील नाटुनाटु या भारतीय गाण्याला ऑस्कर मिळाला. (जय हो हे भारतीय गाणं होतं पण स्लम डॉग मिलेनियर हा भारतीय चित्रपट नव्हता.)

EO नावाच्या बेल्जीयन चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट पसंतीचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट एका गाढवाच्या प्रवासावर आधारित आहे. त्याला व्हेरियन्स चित्रपटाने मागे टाकले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. भारताच्या बाहेर चित्रित झालेल्या फक्त २ चित्रपटांना ऑस्कर मिळाला. ते म्हणजे सर रिचर्ड ऍटोनबर्ग यांचा ‘मधील’. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा. आणि डॅनी बॉयल यांचा स्लम डॉग मिलेनियर श्री AR रहमान यांना सर्वोत्कृष्ट संगीतासाठी (सर्वोत्कृष्ट गाणे जय हो) हे ते दोन पुरस्कार आहेत.

AR रहमान यांना २०१० साली ‘१२७ तास’ या डॅनी बॉयल यांच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत या श्रेणीत नामांकन मिळाले होते. पण पुरस्कार मात्र ‘द सोशल नेटवर्क’ या चित्रपटाच्या संगीत संयोजनाला देण्यात आला. भारतीय लघुपटांनी या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कान्स २०२२ मध्ये शौनक सेन यांच्या ऑल दॅट ब्रेथस ला गोल्डन ग्लोब सर्वोत्कृष्ट लघुपटाचे नामांकन मिळाले. तोच कान्स २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. मागील वर्षी हेच नामांकन रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष यांच्या रायटिंग विथ द फायरला मिळाले होते. कार्तिकी गोन्साल्विस यांचा लघुपट ‘The elephant Whispers’ ज्यात मदुमलाई कॅम्प मध्ये राहणारा लहान मुलगा आणि हत्तीचे पिल्लू यांचे भावनिक नाते दाखवले गेले आहे. त्या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. या दोन नामांकनांमुळे भारतीय सामान्य लोकांच्या जीवनातील कथांना जागतिक व्यासपीठ मिळेल आणि बाहेरील गुंतवणूकदार भारतीय चित्रपटांमध्ये गुंतवणूक करायला तयार होतील आणि अशाच कथांवर काम करतील ज्या ऑस्कर पुरस्कार मिळवण्यास योग्य असतील.

Related posts

Leave a Comment