हयग्रीव अवतार

हयग्रीव म्हणजे घोड्याचे मस्तक. नृसिंहावतारात भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा नाश केला, अशी कथा आहे. हयग्रीवावताराची ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला सांगितली ती अशी – भगवंतानी नुकतीच सृष्टी निर्माण केली होती. त्यानंतर लगेचच अगस्ती ऋषींना एक मोठा यज्ञ करावा असे वाटू लागले. त्यांनी सर्व ऋषींना एकत्र बोलावले. सर्वांनी मिळून यज्ञासाठी लागणारे हत्ती, उंट वगैरे प्राणी तसेच इतर सामग्री गोळा केली. पूर्णाहुती देण्यासाठी त्यांनी घोड्याचे मस्तक कापून बाजूला ठेवले. यज्ञाचे दुष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी ऋषींनी भगवंताकडे मदतीची याचना केली. ऋषींच्या विनंतीला मान देऊन भगवंत धनुष्यबाण घेऊन आले व यज्ञमंडपाच्या दाराशी उभे राहून रक्षण…

Read More

अक्षय्य तृतीयेचे भारतीय संस्कृतीमधील- महत्त्व

अक्षय तृतीया संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. या मुहूर्ताचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व आणि पारमार्थिक अर्थ उलगडणारा हा विशेष लेख.. – अनिता लिमये ‘जशी उसात हो साखर। तसा देहात हो ईशवर’ अशी एक गीतपंक्ती आहे. ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा’ असं संतश्रेष्ठ चोखामहाराज म्हणतात. तसंच अध्यात्माचं आहे. ते आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून आहे. साऱ्याच व्यवहारात, सणवारात, रूढी-परंपरांध्ये ते मिसळून गेलं आहे. ‘अध्यात्मविद्या विधानां’ असं भगवंत स्वत: भगवद्गीतेत विभूतियोग सांगताना म्हणतात. ‘जसे दुधामध्ये लोणी। तसे देही चक्रपाणि.’ तो सर्वगत असला तर गुप्त आहे. विरजण, मंथन या प्रक्रिया जशा लोण्यासाठी आवश्यक…

Read More

‘अक्षय्य’ सुखाचे दान

– विनय सारंग चैत्रमासाची चाहूल लागली की नवनिर्मितीचे, नवसृजनाचे कोंभ फुटून सरासरा वर येतात, घटकापळाचा आश्रय घेत असीम इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद यांच्या सोबतीने स्थिरावतात आणि पानगळीचं निमित्त करून पुन्हा अनंताच्या प्रवासाला निघतात. हा काळ अतिशय भारलेला आणि भारावलेला असतो. क्षितीजाची कड हाती येणार नाही हे माहीत असलं तरीही त्यामागे धावण्याचा जबर अट्टाहास असतो. या जीवनातली प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे, अक्षय्य आहे, या बेफिकिरीने प्रत्येकजण अदृश्याची वाट चालत असतो. आपल्याला सुखसौख्याचं अक्षय्य वरदान लाभलं आहे या जाणिवेतून तो आपलं ‘आयुष्य’ जगत असतो. त्याच्या या जाणिवेला समृद्ध करत असतात ते सणासुदीचे…

Read More

अक्षय मूल्यांचा ठेवा!

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक  असलेला सण होय. यालाच ‘आखिती’ असेही  म्हणतात. रखरखत्या वैशाखात, क्षय न होणाऱ्या  सद्गुणांचा अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा  संगम या सणात आहे. उष्ण कोरड्या हवेचा  आणि रसाळ आम्रफळाचा आस्वाद देणारा  अक्षय तृतीयेचा दिवस.- अर्चना म. दळवी अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाण्याचा घट म्हणजेच जलकुंभ, आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती अक्षय तृतीयेलाच. आज विज्ञान तंत्रज्ञान युगात…

Read More

मानव मुक्तीदाते गौतमबुध्द

– अॅड. जयप्रकाश भंडारे लहानपणापासूनच सिध्दार्थ गौतम बुध्द विचारी होते. एकांतात बसून ते जगातील चांगल्या व वाईट गोष्टींबद्दल विचार करीत असत. ते नेहमी मानवाला होणाऱ्या व्याधी, दु:ख, मरण याविषयी विचार करत. मनुष्य मनुष्याचे शोषण का करतो? समाजामध्ये विषमता का आहे? या विचारातून मनुष्याची दयनीय अवस्था बघून सिध्दार्थाचे मन द्रवीत झाले. वयाच्या २८ व्या वर्षी सर्व ऐश्वर्य सोडून ते मानवाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडले. निरंजना नदीच्या किनारी एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी सतत सहा वर्षे घोर तपश्चर्या केली. इ.स. पूर्व ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला बौध्द गया येथे…

Read More

संशोधक, समीक्षक, आंबेडकरी विचारवंत

– गंगाधर पानतावणे डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (जून २८, इ.स. १९३७-२७ मार्च इ.स. २०१८) हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. सुरुवातीचे जीवन व शिक्षण गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूर मधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जुळलेले होते. त्यांचे आडनाव ‘पानतावणे’चा अर्थ होता पाणी गरम करणारे. गरिबीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत…

Read More

शुभ संकल्पाचा सण गुढी पाडवा

gudi-padwa-auspicious-time

गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगल मुहूर्त आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खऱ्या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, बंगला खरेदी करणे, नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे, जमीन, प्लॉट खरेदी इतकेच काय, पण वाहन खरेदी, सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम व आदर्श मानला जातो. ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्वदोष काही प्रमाणात कमी होतो. शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी : ढी पाडव्याला घराची…

Read More

परशुराम जयंती विशेष

Parashurama Jayanti

परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार – कमलाकर तांबे परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. आईवडील – परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला. कार्य – अधम अशा क्षत्रियांचा वध : ‘वाल्मीकीने त्याला ‘क्षत्रविमर्दन’ न म्हणता ‘राजविमर्दन’ म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’ कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व…

Read More

श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज

swami-maharaj

श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला आहेत.ही स्थाने फार प्रसिध्द आहेत.श्री दत्त संप्रदायामध्ये या स्थानांना फार महत्त्व आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मगांव पीठापूरम (आंध्रप्रदेश) व कर्मभूमी कुरवपूर (कर्नाटक) ही स्थाने श्री. प. प. टेंब्ये स्वामीमहाराजांनी शोधून प्रसिध्दीस आणली.तसेच श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा’ हा महामंत्र पुनरूज्जीवित केला.तसेच श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान लाड कारंजा, (जि. वाशिम) हे ही त्यांनी शोधून…

Read More

होली | मनातील अपप्रवृत्तीचे दहन करणारी होलीकोत्सव

holikosav

देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट´ात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतगमनोत्सव’ म्हणजे वसंत Fतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलतः अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच…

Read More