असं म्हणतात की महाशिवरात्रीला थंडी ‘शिव शिव’ असं म्हणत परतीच्या मार्गावर जायच्या तयारीला लागते. आणि साधारण होळीपर्यंत ती काढता पाय घेते. पण या वर्षी वेगळाच प्रकार झाला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची प्रखर लाट आली. १२ मार्च दरम्यान मध्य भारतातील तापमान अचानक वाढलं. सौराष्ट्र, कोकण, कच्छ, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, ओडिशा या भागात तापमानात वाढ झाली. हवामान खात्याने येत्या काही दिवसात हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. (गंमतीचा भाग हा की आजकाल हवामान खात्याचे सर्वच अंदाज अचूक ठरतायत) अर्थात यात तंत्रज्ञानाचाही मोलाचा वाटा आहेच. पश्चिम राजस्थान मध्ये काही…
Read More