ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरांवर आणि विविध पक्षांमध्ये जी मंडळी जनतेचे नेतृत्व करीत आहेत, त्यांच्या यादीवर नजर टाकली तर समाजाचे व देशाचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, धमक आणि कौशल्य यापैकी किती जणांमध्ये असेल याची दाट शंका यावी असे देशाच्या राजकारणाचे विषण्ण करणारे आजचे वास्तव आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेचे इतके अवमूल्यन गेल्या ५०-६० वर्षांत झाले आहे की, दमदार नेतृत्व निर्माण करण्याची शक्ती एकाही राजकीय पक्षामध्ये दिसत नाही; आणि म्हणूनच नरेन्द्र मोदींसारखा एखादा अपवादात्मक दिसणारा आशेचा किरण लोकांना आश्वासक वाटतो. वास्तविक इतक्या वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेतून प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक राज्यात दमदार, विचारशील, आचारशील तरुण नेतृत्वाची…
Read More