भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वात वाईट विषयावर चाललेली चर्चा म्हणजे ही आहे की त्यांचा कर्णधार हा संघातील सर्वात लोकप्रिय माणूस नाही. BCCI ने त्याला हकलण्याचे धाडस केले आहे. पुढे जाऊन तेच झाले. आणि एकेकाळी सर्वात चांगला कर्णधार पद भूषविलेल्या कोहलीकडे तो निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. BCCI भारत विश्व्चषकातून अनाठायी बाहेर पडल्यानंतर लगेच बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीची भारताचा कर्णधार म्हणून असलेली इनिंग संपवली. आणि कर्णधार पदाची सूत्रे रोहित शर्माकडे दिली.
BCCI ने ४८ तास टी २०च्या कर्णधार पदाचा आधीच त्याग केलेला कोहली एकदिवसीय सामन्याच्या नेतृत्वातून स्वेच्छेने पायउतार होतो का याची वाट पहिली पण त्याने तसे केले नाही. ४९व्या तासापर्यंत रोहित शर्माचे स्थान गमावणे निश्चित होते. कदाचित त्याची वेळ संपली आहे हे सांगायला सुद्धा BCCI ने कोहलीला वेळ दिला नाही. BCCI ने केलेल्या विधानामध्ये एवढेच म्हणाले आहे की, पुढे जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी २० खेळामध्ये समितीने कर्णधार पदासाठी रोहित शर्माचे नाव पुढे केले आहे. अशा प्रकारे कोहलीने कर्णधारपद गमावले.
BCCI ने आणि राष्ट्रीय निवड समितीने प्रसिद्ध कोहलीची अशाप्रकारे हकालपट्टी केली. कोहली ने २०२३च्या विश्व् चषकात घरच्या मैदानावर भारताचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. ज्या क्षणी भारताला ग्रुप लीग स्टेज मधून विश्व् चषकातून बाहेर काढण्यात आले त्या क्षणी कोहलीचे नेतृत्व कसे आहे ते स्पष्ट झाले. परंतु BCCIच्या धुरिणींना साडेचार वर्ष कर्णधार पद सांभाळलेल्या कोहलीला सन्मानाने अलविदा म्हणायचे होते. BCCI ने त्याला हकलण्याचे धाडस केले आहे. पुढे जाऊन तेच झाले. आणि एकेकाळी सर्वात चांगला कर्णधार पद भूषविलेल्या कोहलीकडे तो निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. कोहलीचा कर्णधार पदापर्यंतचा प्रवास खूपच रोमहर्षक आहे.

कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वाखाली एक चपळ आणि शिकाऊ उमेदवार म्हणून कोहलीची सुरुवात झाली धोनी ने त्याला अत्यंत चांगले प्रशिक्षण दिले. त्याला एकदिवसीय सामन्याचे कर्णधार पद देण्याआधी किमान दोन वर्षे विश्व् चषकाची तयारी करून घेतली. पुढील दोन वर्षात कोहली भारतीय संघाचा हरहुन्नरी कर्णधार बनला जो स्वतः गोष्टी हाताळू शकत होता. यामुळे झालं असं की प्रशासकांची एक सर्वोच्च रन समिती होती. ज्याने त्यांच्या प्रत्येक मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यातल्या काही चूक होत्या. तर काही बरोबर होत्या. आणि मग एक वेळ अशी आली की पारंपरिक प्रशासक आणि सचिव परत आले. ज्यांना स्वतःला यशस्वी कर्णधार होण्याबाबत एक गोष्ट माहित होती.

ते म्हणतातना एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसा काहीसा प्रकार झाला. ऑस्ट्रेलियाकडे आरोन फिंच तर इंग्लंडकडे इ ऑन मॉर्गन हा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार होता. भारताकडे कोहली कसोटी सामन्याचा तर धोनी २ वर्षांसाठी वनडे आणि टी २० चा कर्णधार होता. पण जे भारतीय क्रिकेटला जवळून फोल्लो करतात त्यांना या घटनेमुळे आश्चर्य वाटू नये. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वात वाईट विषयावर चाललेली चर्चा म्हणजे ही आहे की त्यांचा कर्णधार हा संघातील सर्वात लोकप्रिय माणूस नाही. कोहली खूप मनमिळाऊ आहे पण त्याच्या कुटुंबामध्ये तो खेळाडूंचा पाठीराखा नाही असे नेहमी ऐकण्यात आले आहे.
१६ सप्टेंबर रोजी पीटीआयने लिहिले आहे की कोहली ड्रेसिंग रूम पासून कसा दूर गेला. आणि हे काही एका दिवसात झाले नाही. विराटची सर्वात मोठी कमकुवत बाजू काही असेल तर ती आहे त्याची विश्वासार्हता. जे काही असेल ते स्पष्ट बोलण्याकडे त्याचा कल असतो. पण जिथे एक टीम लिडर म्हणून त्याने आदर गमावला तो मुद्दा होता संवादाचा अभाव. असे काही वर्षांपूर्वी भारतीय ड्रेसिंग रूमचा एक भाग असलेल्या खेळाडूने सांगितले. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की विराट फलंदाजी चांगली करतो. पण त्याला माणसांचे व्यवस्थापन करायला जमत नाही. महत्वाच्या दिवशी त्याचे निर्णय हे समोरच्याला गोंधळात टाकणारे असतात. मुद्दाम कोणीही कोणाला गोंधळात टाकत नाही. अनिल कुंबळेने तसे प्रयत्न केले होते पण ते अपयशी ठरले.

अशा अनेक घटना आहेत जिथे एक दोन अपयशानंतर खेळाडूंना त्यांच्या संघातील स्थानाबद्दल असुरक्षितता वाटू लागते. पूर्वी एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आणि त्याचा खेळ उत्तम असेल तर त्यांना सन्मानित केले जाई. पण कर्णधार म्हणून एखादा खेळाडू जेव्हा चांगला खेळ करत नसे तेव्हा त्याने कधीही त्याला व्यवस्थित ट्रैनिंग द्यायचा त्रास घेतला नाही. कुलदीप यादव सारख्या खेळाडूला विराटने केलेले मार्गदर्शन हे कॅप्टन म्हणून सर्वात वाईट होते. एक चांगली प्रतिभा असणाऱ्या खेळाडूला तो कुठे चुकला तेच कळले नाही. फक्त कुलदीप नाही तर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत हे माहित नव्हते. ग्रेपवाईनच्या थेअरीवर विश्वास ठेवला तर इंग्लंड मालिकेच्या शेवटी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली कोहलीला सपोर्ट स्टाफशी सुद्धा जुळवून घेणे अवघड झाले होते. असे नव्हते की त्यांच्यात काही कुरबुरी होत्या.
पण हेही तितकेच खरे होते की शास्त्री आणि कोहली एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते कोहलीची मानसिक तयारी आधीच झालेली असल्याने त्याला हे सहन करणे फारसे अवघड गेले नाही. धोनीची हॉटेलची खोली सर्व खेळाडूंसाठी खुली होती. कोणीही येऊ जाऊ शकत होते. प्ले स्टेशनचा गेम खेळणे, मौजमजा करणे, आणि टेक्निकल गोष्टीवर चर्चा करणे एवढ्यापुरते हे मर्यादित नव्हते. एक सक्षम संघ तयार करण्यासाठी ते महत्वाचे होते. विराट मात्र एकदा नेतृत्व सोपवल्यावर टीमपासून अलिप्त झाला. गेल्या काही वर्षांमध्ये रोहितच्या रूपाने जुनिअर्सना एक मोठा भाऊ मिळाला. ज्याने त्यांना आश्वासक हात देऊ केला.

तो असा माणूस बनला जो आपल्या टीम मेट्स ना बाहेर जेवायला घेऊन जायचा आणि जर कोणी पाच सामन्यात ५० पेक्षा कमी धावा केल्या असतील तर त्याच्याकडे जाऊन फक्त एवढच सांगायचा’’ काळजी करू नका मी तुमच्यासाठी आहे’’. ही विराटसाठी एक नवी सुरवात असेल. आता हे बघायचे आहे की तो हा बदल कसा स्वीकारतो. जिथे आता तो निर्विवाद लीडर नाही. तो अजूनही कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्याची कामगिरी आजही अभिमान वाटावा अशी आहे. टेस्ट मॅचचा कर्णधार म्हणून तो कशी कामगिरी करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. जिथे त्याच्यावर कुठलेच बंधन नाही. विराट कोहलीचे कर्णधार पदाचे आव्हान संपुष्टात येत आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माचे नेतृत्व कसे बहरते हे पाहणे अधिक रोमांचक ठरेल.
