अननसाचा गर स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी प्रभावी आहे.

एका उंदरावर केलेल्या प्रयोगाअंती हे सिद्ध झाले आहे की अननसाचा गर हा स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांसाठी खात्रीलायक इलाज आहे. स्मृती भ्रंश हा मेंदूशी संबंधित आजार आहे. ज्यात विस्मरण होते. मेंदूतील अमीबाईड बीटा हे प्रोटीन वाढल्याने हा आजार होतो. हा आजार झालेल्या रुग्णांना गोष्टी लक्षात राहत नाहीत. हा आजार जर मोठ्या प्रमाणात झाला तर रुग्णांना भ्रम होऊ शकतो. आणि दैनंदिन गोष्टी करण्यात अडथळा येऊ शकतो. फगवारा पंजाब येथील एका महाविद्यालयाने केलेल्या संशोधनानुसार आताची उपलब्ध औषधे स्मृतीभ्रंशावर प्रभावी नाहीत.

निरो टॅक्सिकोलॉजी या मध्ये दिलेल्या संशोधनानुसार ब्रोमोलिनचे योग्य प्रमाण हा स्मृतिभ्रंशावर योग्य इलाज ठरू शकतो. हा प्रयोग उंदरावर करण्यात आला. यामध्ये त्याच्या मेंदूतील बायोकेमिकल आणि हिस्टोपॅथोलॉजिकल याचा परिणाम अभ्यासण्यात आला.या अभ्यासावरून उंदराच्या मेंदूतील न्यूरो ट्रान्समिशन आणि अँटीऑक्सिडेन्टचे प्रमाण ब्रोमोलिन मुळे सुधारल्याचे दिसले. आणि ब्रोमोलिन दिल्यानंतर उंदराच्या मेंदूतील बीटा एंझाइम, बीटा एमलॉइड आणि इतर घटक तसेच ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर या सर्वांमध्ये सुधारणा झाली.

Related posts

Leave a Comment