अर्थसंकल्प हा शब्द ऐकल्यावर पहिल्यांदा आपल्या मनात येणारा विचार म्हणजे एकूणच आर्थिक नियोजन कसं करावं हे त्यात सांगितलेलं असेल. येणाऱ्या काळात एखाद्या गोष्टीमधून होणारं उत्पन्न किंवा खर्च. किंवा एखाद्या गोष्टीसाठी सरकारने अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद केली आहे हे सगळं अर्थसंकल्पात सविस्तरपणे सांगितलेलं असतं. उदा. शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या योजना आखल्या आहेत, रस्तेबांधणी वर किती खर्च केला जाणार आहेत वगैरे. देशाच्या तसेच सामान्य जनता तसेच शेतकरी आणि समाजातील इतर घटकांच्या विकासासाठी कोणती उपाययोजना करायला हवी यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात विविध तरतूदी केलेल्या असतात. अर्थसंकल्पात सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा तरतूद केलेली असते. …
Read More