गेल्या ५ वर्षात ७.३६ लाख लोक रस्ते अपघातात ठार.

सरकारच्या मते सुमारे ७,३६,१२९ लोक हे साल २०१७ ते २०२१ मध्ये रस्ते अपघातात मारले गेले आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही अपघातांमागची कारणे आहेत. या विषयावर लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की एका वर्षातील रस्ते अपघाताचे प्रमाण बघण्यासाठी विविध राज्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यात अपघाताची मुख्य कारणे अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही आहेत, त्याशिवाय चुकीच्या बाजूने गाडी चालवणे मार्गिकेची शिस्त न पाळणे, लाल सिग्नल तोडणे, हेलमेट सीटबेल्ट…

Read More

आजकाल गाडीच्या मागच्या सीट्सना सुद्धा सिटबेल्ट्स असतात. चांगली गोष्ट आहे. पण खराब रस्त्यावरून गाडी चालवताना ते आपला बचाव करू शकतील का?

५४ वर्षीय श्री सायरस मिस्त्री यांचा झालेला अपघाती मृत्यू सिटबेल्ट्स विषयी जागृतीची मोहीम सुरु करायला हवी असे सुचवू पाहत आहे. मागच्या सीट्सना जे सिटबेल्ट्स असतात ते लावायला हवेत. पण लोक ते लावताना दिसत नाहीत. आणि म्हणूनच रस्ते अपघातांना लोक बळी पडतात. खरतर गाडी चालवायला शिकवताना प्रशिक्षकाने आपल्याला सिटबेल्ट्सचे महत्व सांगितलेले असते. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो.  प्रसिद्धी माध्यमांवर या अपघाताची चर्चा होताना दिसत आहे. एवढीच सखोल चर्चा जर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करून त्यावर उपाय शोधले तर बरे होईल. एवढी सखोल चर्चा करून सिटबेल्ट्स न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. एवढाच तोडगा…

Read More