गेल्या २५ वर्षांत जागतिकीकरण आणि खाजगीकरणामुळे नोकरदारांच्या जीवनपद्ध-तीत अमूलाग्र बदल झाला आहे. सर्वच उद्योग, व्यवसाय, आस्थापनांच्या कार्यालयात ‘कामाची वेळ काटेकोरपणे पाळली जात आहे,’ असं चित्र नाही. पूर्वी साडेसहा, आठ तास ड्युटी असायची. अनेक ठिकाणी कार्यालयीन कामाचा हा नियम नीटपणे पाळला जायता. आजमात्र कमीत कमी कामगार कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची व्यवस्थापनाची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही वाढीव वेतन वा भत्त्याशिवाय कर्मचाऱ्यांना १२-१२/१४-१४ तास काम करावं लागत आहे. शिवाय निवासाचं ठिकाण नोकरीच्या ठिकाणापासून दूर असल्यामुळे प्रवासातही माणसांचा वेळ अधिक जातो. नोकरी टिकविण्याच्या आणि पैसे कमविण्याच्या या धडपडीमुळे माणसांच्या आणि समाजाच्या…
Read MoreDay: November 30, 2017
आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार
भारत हा एक विविधतापूर्ण देश आहे. त्याच्या अनेक समस्या आहेत. बेकारी ही त्यातील एक आहे. भारतातल्या कोणत्याही समस्येची सर्व प्रांतांसाठी सरसकट समान मांडणी करणे वा तिची सर्वत्र एकाच पद्ध-तीने उकल वा निराकरण करणे शक्य नाही. बेकारीच्या समस्येलाही अनेक पैलू आहेत. तिचे विश्लेषण वेगवेगळ्या पद्ध-तीने होऊ शकते. तसेच तिचे निराकरण करण्याचे उपायही वेगवेगळ्या प्रभागांसाठी वेगवेगळे असू शकतात. भारतात जसे केरळसारखे शिक्षणाच्या दृष्टीने अग्रेसर राज्य आहे तसेच काश्मीरसारखे सर्वात अप्रगत राज्यही आहे. काश्मीरच्या बाबतीत पर्यटन विकास हे बेकारी निराकरणाचे उत्तम साधन होऊ शकते. मग भले तिथे शिक्षण कमी असले तरी. पण तो…
Read Moreभारतातील ग्रामीण बेरोजगारीचा प्रश्न
– प्रशांत असलेकर उच्च शिक्षण घेतलेला तरूण समाजाची कोणतीही गरज भागवायला सक्षम नसतो. त्याचप्रमाणे बरेचदा असे दिसून येते की एखाद्या क्षेत्रातले पूर्ण शिक्षण घेतलेला तरूण त्या क्षेत्रातल्या व्यवहारी ज्ञानापासून अनभिज्ञ असतो. त्यामुळे त्याने घेतलेले शिक्षण आणि त्या क्षेत्रात झालेले बदल यांच्यात मोठी तफावत पडते. पाठ्यपुस्तकीय ज्ञान व्यवहारी पातळीवर निरुपयोगी शाबित होते. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी बेकारी वाढण्यासाठीही हे एक मोठे कारण आहे. भारतातील शिक्षण व्यवस्था पाठ्यपुस्तकीय ज्ञानावर जास्त भर देते. तिच्यात रोजगारविषयक शिक्षणाचा अभाव आहे. छोटे व्यवसाय उदा. सुतारकाम, वेल्डींग, टर्नरकाम, गवंडीकाम-मिसनरीवर्क, कपडे शिलाई, वायरमन, प्लंबर, घरगुती उपकरणांची दुरूस्ती,…
Read Moreरोजगार निर्मितीची गंगोत्री मुंबई
मुंबई नगरी जगात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहे. मुंबई तसेच तिच्या आसपासच्या नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई, विरार, डहाणू ह्या प्रदेशांचाही मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि चैतन्यामध्ये मोठा वाटा आहे. श्रमिक, कामगार, कर्मचारी तसेच उच्चभ्रू व्यावसायिक, चाकरमान्यांचे योगदान आहे. मुंबईची लोकसंख्या जरी आज सव्वा कोटी असली तरी मुंबईत रोज बाहेरून ये जा करणाऱ्यांची संख्या आणखी तीस लाखांच्या घरात आहे. हे सारेच रोज रोजगार मिळविण्याच्या आणि त्यातूनच आपले जीवन पुढे धावडवण्याच्या उद्देशाने करतात. मुंबईची जीववाहीनी जी उपनगरीय रेल्वेसेवा आहे, त्या तिन्ही म्हणजे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरं या रेल्वे मार्गावरून रोज…
Read Moreश्रमाला प्रतिष्ठा व पैसा देणारी मायानगरी
प्रत्येक काळात माणसाच्या गरजा बदलत असतात. सामाजिक स्तरानुसार त्या वेगवेगळ्या असतात. आजच्या मुंबईकरांच्या गरजा वेगळ्या आहेत. उंच उंच टॉवरमध्ये आणि श्रीमंत वस्तीत राहणाऱ्या लोकांना जी कामं करून हवीत ती मध्यम वर्गातील स्त्रीपुरुष स्वत: करतात. तर मध्यमवर्गातील कुटुंबाना ज्या कामासाठी नोकर ंिकवा व्यक्ती हवी असते ती कामं निम्न स्तरातील माणसांच्या अंगवळणी पडलेली असतात. आय.टी.मध्ये काम करणाऱ्याच्या अडचणी वेगळ्या. नवरा बायको नोकरीला असतील तर त्यांच्या अडचणी वेगळ्या, अमाप पैसा असणाऱ्या श्रीमंतांच्या मागण्या वेगळ्या. त्या नमेकेपणे अभ्यासल्या आणि त्या सोडविण्यासाठी तयारी ठेवली तर चोख पैसा देणारा स्वयंरोजगार सुरू करणं कठीण नाही. महिला वर्गासाठी…
Read More