– ऋतुजा सावंत शाहरुख, आमिर, तुषार कपूर, करण जोहर आणि आता मुंबईत नुकतीच घडलेली घटना यावरून पुन्हा एकदा सरोगसीची चर्चा सुरू झाली आहे. सरोगसी (नियमन) विधेयक २०१६ केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलं असून ते आता संसदीय समितीसमोर आहे. यामध्ये सरोगेट माता आणि बाळाच्या सुरक्षेविषयी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचं कुठे स्वागत, तर कुठे आक्षेप असं चित्र आहे… काख झर्रकन सरकतोय. तंत्रज्ञानाने आणि विचारांनीही. आपल्याला मूल नाही म्हणून नवऱ्याचं दुसरं लग्न सहन करणारी ती आणि आता सरोगसीच्या माध्यमातून भाडोत्री मातृत्व शोधू पाहणारी ती यात सर्व बाजूंच्या परिस्थितीत बदल झाला तरीही मातृत्वासाठी…
Read MoreAuthor: mahanagari
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार
– नितीन रणदिवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचे रूपही दिले पाहिजे. राजकीय लोकशाही तिला आधारभूत अशी सामाजिक लोकशाही नसल्यास टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तिचा अर्थ आहे, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांनी जीवनाचे सिद्धांत म्हणून मान्य करणारी जीवनप्रणाली. स्वतंत्र्यता, समता व बंधुभाव सिद्धांत म्हणजे एकाच त्रयीची भिन्न भिन्न तत्त्वे मानता येणार नाहीत. समाजाच्या स्थितीसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्थेत अशी ही एक स्थिती येते की तेव्हा तिची वाढ खुंटते, तिच्या नाड्या थंड पडतात.…
Read Moreबौद्ध धर्माचे तीन सिद्धांत
बौद्ध दर्शन तीन मूळ सिद्धांतावर आधारीत आहे. १. अनिश्वरवाद. २. अनात्मवाद. ३. क्षणिकवाद. १. अनिश्वरवाद – बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही. २. अनात्मवाद – अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ…
Read Moreया अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटलं जातं. आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. अक्षय्य तृतीया हा सण सरत्या चैत्राचा आणि उगवत्या वैशाखाचा म्हणजेच संधीकाळाचा. चैत्रासंगे आलेल्या वसंत ऋतूचा हिरवा बहर अजूनही अगदी तजेलदार व रसरशीत असतो. शिशिराच्या थंडीनं गारठलेली सृष्टी पुन्हा नव्या उमदीनं वसंताचा म्हणजे हिरवाईचा शेला पांघरून चैत्र पालवीनं पुन्हा नव्या रूपात नवचैतन्याची आशा मन मोहरून टाकते. याच पार्श्वभूमीवर वैशाखाच्या सुरुवातीलाच ग्रीष्माला साद देत अक्षय्य तृतीया येते. हा दिवस खऱ्या अर्थानं वसंतोत्सवाचा. – सुगंधा मिसाळ अक्षय्य तृतीया हा अक्षय्य सुखाची साठवण करण्याच्या प्रयत्नांना उत्तेजन देऊन सुखाची बरसात करणारा…
Read Moreसौख्यसुखाची लयलूट
आपल्या आनंदाचं अक्षय धन उधळण्यासाठीचं निमित्त शोधत, प्रसंगी रितीरिवाजांचं बोट धरून हे सण-समारंभ येत असतात. अशाच अनेकानेक आनंदभरल्या मैफलीत अक्षय्य सुखाचं मधाळ बोट लावणारा हा अक्षय्य तृतीयेचा सण प्रत्येकाच्याच सुखेनैव आयुष्याला फुलवण्याचं काम करतो. – मंजिरी कदम आपले धर्मग्रंथ, त्यातून ठळकपणे समोर येणारे नीतिनियम, परंपरा आणि चालीरिती हे सारं काही सर्वसामान्य लोकांच्या जीवन जगण्याच्या पारंपरिक पद्धतींशी संबंधित आहे. त्यातलाच एक भाग आहे साडेतीन मुहूर्तांचा. दसरा, दिवाळी पाडवा, चैत्र पाडवा आणि त्यामागून लगोलग येणारा अक्षयतृतीयेचा सण म्हणूनच आजही आपले महत्त्व राखून आहे. कोणतंही, कसलंही नवं काम वा चांगल्या कार्याची सुरुवात या…
Read Moreज्ञानतपस्वी भारतरत्न – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
– प्रा. शांताराम हिवराळे मुंबईला आल्यानंतर खूप प्रयत्नांनी त्यांना तीन वर्षासाठी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांनी खूप काटकसर करून पैसा जमविला. सन् १९२० मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते लंडनला गेले. तेथे एका इंग्रजबाईकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागले. १९ तासांपेक्षा अधिक अभ्यास त्यांनी केला. एक कप चहा, थोडे दूध, थोडा जॅम, एक-दोन पापड अन् पोटभर थंडगार पाणी हा त्यांचा आहार असायचा. कधी अर्धपोटी राहून भीमरावांनी इ.स. १९२१ मध्ये अर्थशास्त्रात लंडन विद्यापीठाची एम.एस्सी पदवी प्राप्त केली. इ.स. १९२२ मध्ये प्रॉब्लेम ऑफ रूपी हा प्रबंध डी.एस्सी.…
Read Moreमोरपंखी आठवणी आखाजीच्या
खान्देशातील अक्षय्यतृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीचा मुक्तीदिनच. मुली महिलांचा आनंदोत्सव! एवढेच नव्हे तर लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपणसुद्धा. चैत्र वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था. – लतिका चौधरी, दोंडाईचा, जि.धुळे भारतीय सण, बोलीभाषा, रितीरिवाज, परंपरा ही स्वतंत्र सांस्कृतीक वैशिष्ट्ये जपून आहेत. त्यात अक्षय्यतृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाखशुद्ध तृतियेस साजरा केला जातो. याच दिवशी कृतयुग प्रारंभ होतो असे म्हणतात. या दिवशी , हा पवित्रदिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय…
Read Moreमहात्म्य अक्षय्य तृतीयेचे
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे.) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया हे व्रत कसे…
Read Moreखान्देशातील दिवाळी – आखाजी (Akshaya Tritiya)
अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते. जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्य़ांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ म्हणून ओळखले जाते. स्त्री वर्गाला माहेरची ओढ लावणारे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. त्यात विदर्भातील आखाडी, तर मराठवाडय़ातील नागपंचमी आणि खान्देशातील आखाजी या सणांचा समावेश करता येईल. खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहेत. – अेिशनी माजल-कर वैशाख शुद्ध तृतीयेला देशावर अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. याच…
Read Moreहयग्रीव अवतार
हयग्रीव म्हणजे घोड्याचे मस्तक. नृसिंहावतारात भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा नाश केला, अशी कथा आहे. हयग्रीवावताराची ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला सांगितली ती अशी – भगवंतानी नुकतीच सृष्टी निर्माण केली होती. त्यानंतर लगेचच अगस्ती ऋषींना एक मोठा यज्ञ करावा असे वाटू लागले. त्यांनी सर्व ऋषींना एकत्र बोलावले. सर्वांनी मिळून यज्ञासाठी लागणारे हत्ती, उंट वगैरे प्राणी तसेच इतर सामग्री गोळा केली. पूर्णाहुती देण्यासाठी त्यांनी घोड्याचे मस्तक कापून बाजूला ठेवले. यज्ञाचे दुष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी ऋषींनी भगवंताकडे मदतीची याचना केली. ऋषींच्या विनंतीला मान देऊन भगवंत धनुष्यबाण घेऊन आले व यज्ञमंडपाच्या दाराशी उभे राहून रक्षण…
Read More