15 हजार कोटींच्या वस्तू व सेवा कराच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी आणखी 3 संशयितांना अटक केली आहे. म्हणजेच या खटल्यातील एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. ज्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली त्यांची नावे अनुक्रमे अतुल गुप्ता, सुमित गर्ग, मनन सिंघल अशी आहेत. हे तिघेउत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. अटक केल्यानांतर त्यांच्याकडून सहा कंपन्यांची जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, दोन आधारकार्ड, तीन मोबाईल फोन, तसेच 42 हजारची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यामध्ये हजारो बनावट कंपन्या तयार केल्या जातात. आणि त्यांच्या नावाने इ-वे बिल्स तयार…
Read MoreCategory: अन्य
15 हजार कोटींचा वस्तू आणि सेवा कर घोटाळा उघडकीस ! गरीब लोकांच्या आधार कार्डावरील
फळविक्रेता, शिंपी, शेतकरी यांच्या मुलांची अग्नीवीर म्हणून निवड !
कवायतीच्या मैदानावर जवानांची मुले, शेतकऱ्यांची मुले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुले, एलआयसी एजन्टची मुले, दुकानदारांची मुले कवायती करताना दिसतात. त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे.फोटो- यशस्वी संचलन करून दाखवल्यावर अग्नीवीर म्हणून निवड झालेली मुले जल्लोष करताना.कवायतीच्या मैदानावर जल्लोष सुरु होता. प्रशिक्षणार्थी जोर बैठका काढत होते. कारण अग्नीवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुकाने एकमेकांची पाठ थोपटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीचा स्विकार करत ते आपल्या पालकांना भेटायला गेले.आकाशातून सूर्य आग ओकत होता. पण त्यामुळे या…
Read Moreबँक ऑफ महाराष्ट्र : बुडीत कर्जे ११२०० कोटी!
बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०१४ पासूनचे ४२ बुडीत खाते धारकांचे ११,२०४.१० कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण खातेधारकांची नावे विचारली असता त्यावर मौन पाळले. तसेच आर्थिक वर्ष १३-१४ या वर्षातील बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली २५४८.१३ कोटींची रक्कम माफ केली आहे. गेल्या ९ वर्षात मोठे खातेधारक आणि लहान खातेधारकांकडून बँकेला फक्त १५% पेक्षा कमी रक्कम वसूल करता आली आहे. मोठे खातेधारक ज्यांनी १०० करोड पेक्षा जास्त पैसे थकवलेले आहेत आणि लहान खातेधारक ज्यांच्याकडून १० करोड किंवा त्यापेक्षा कमी येणी बाकी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे भाग धारक श्री.…
Read More“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’
“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’ तर्फे आपले संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठी समर्पित करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बोरिवलीचे आमदार श्री. सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विट्टी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोरोना महामारीच्या या कठीण काळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावले आहे. या दरम्यान अनेक डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा डॉक्टरांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच “राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने…
Read Moreभारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकास
भगवंत हा परिपूर्ण आहे. तोच एक पूर्ण आहे. त्याच्या आपण जितके जवळ जाऊ तितके त्याचे गुण आपल्यात उतरतील. आपल्याला यश, श्री, धन, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य,औदार्य प्राप्त होईल. ही भारतीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा आहे. विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विकसित होणे, उत्क्रांत होणे हा निसर्गनियमच आहे. म्हणून प्रत्येकाने सतत विकासाची कास धरावी. आजकाल व्यक्तिमत्त्व विकास हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेक लोक व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे आक्रमकता अंगी बाणवणे, समोरच्याला खाऊन टाकणे असे समजतात. या विषयाशी संबंधित अनेक कोर्सेस सध्या चालतात. ते चूक नाहीत पण या ठिकाणी आपण…
Read Moreकृषी परिवर्तन अर्धा प्याला भरलेला
-प्रशांत असलेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक निःशब्द क्रांती घडते आहे. कृषी पदवी घेतलेले तरूण प्रत्येक तालुक्यात तयार होत आहेत. शेतीबाबत नवनवे प्रयोग करीत आहेत आणि त्यांच्या प्रयोगांना चांगले यशही मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाचल्या की वाटते की शेतीची परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे.एका दृष्टीने पाहिले तर प्याला अर्धा रिकामा आहे. परंतू नवनवे प्रयोग करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या की वाटते सगळीच आशा अजून संपलेली नाही. बरेच काही आशादायकही घडत आहे. तोच प्याला अर्धा भरलेलाही आहे. एक नवा महाराष्ट्र घडतो आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची ओळख टँकरच्या देशा अशी बनत चालली आहे.…
Read Moreकम्युनिस्ट दहशतवादाचा भयानक चेहरा !
– शरद मेस्त्री. दहशतवाद म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते जम्मू-काश्मीर; परंतु तेवढाच भयावह, त्यापेक्षाही अधिक आणि क्रूर दहशतवाद केरळमध्ये कम्युनिस्टांचा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये किमान त्यांची घटना आणि कायदे तरी वेगळे आहेत. येथे तर आपली घटना लागू असून तरतुदींचीही पायमल्ली होते. तरीही कोठेही वाच्यता नाही. केवळ आपलेच विचार आणि आचार महत्त्वाचे असून अन्य विचार ंिकवा कृती त्यांच्या साम्राज्यात आलेले त्यांना रुचत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना यमलोकी पाठविण्यात येते. या विचारांना विरोध कराल, तर मृत्यूला तयार राहा, अशीच अराजकता देशातील या सर्वोच्च सुशिक्षित राज्यात आहे. केरळ म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण.…
Read Moreआर्थिक वृद्धिसाठी पायाभूत सुविधांवर भर
२०१७-१८च्या अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या ‘यंग डेव्हलंिपग इंडिया’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतूक पायाभूत प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रस्ते, रेल्वे व नद्या या देशाच्या जीवनवाहिन्यांना प्राधान्य दिले आहे. नव्या वाहतूक सोयी निर्माण होण्यासाठी २ लाख ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. -प्रतिनिधी भारताच्या प्रगतीत जर पायाभूत सुविधा पुरेशा नसतील, तर अडचणीचे ठरू शकते. सध्याच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट´ीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्या वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य दिलेले आहे. काही काळापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व…
Read Moreनाट्यरंग – मुघले आझमचा अभूतपूर्व नाट्याविष्कार
– सतीश सिन्नरकर. हिन्दी सिनेमाच्या इतिहासात ‘मुघले आझम’ सिनेमाची निर्मिती म्हणजे एक महद् आश्चर्य मानले जाते. के. असिफ यांनी आपले सर्वस्व ओतून सतत ९ वर्षे मेहनत केली व हा अद्वितीय चित्रपट बनविला. त्या काळच्या चित्रपट निर्मितीच्या खर्चाचा विचार केला तर मुघले आझमचा खर्च किमान १०० पट जास्त झाला. या सिनेमाची कहाणी म्हणजे एक स्वप्ननगरी असून प्रत्येक बाबतीत तिचे अनोखेपण अधोरेखित होते. पहिला सिनेमा कृष्णधवल असूनही २५ आठवडे सतत चालला व त्यानंतर ४४ वर्षांनी २००४ मध्ये हा चित्रपट रंगीत केला त्यावेळीही तो २५ आठवडे चालून त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले. हा सिनेमा…
Read More‘गांधी – द म्युझिकल’ : प्रभावी संगीत नाटक
आपल्याकडे काही विषय असे आहेत की त्यावर प्रत्येक कलेच्या माध्यमातून सादरीकरण करता येते. महात्मा गांधी यांच्यावर आजपर्यंत पुस्तके, कविता, सिनेमा, नाटके सर्व झाली आहेत. पण या विषयावर संगीत नाटक होऊ शकते असा मात्र कधी विचार कोणाही कलाकाराच्या मनात आला नसेल. पण हे आव्हान दानेश खंबाटा या व्यक्तीने स्वीकारून त्याचे लेखन व दिग्दर्शन करीत ‘गांधी-द म्युझिकल’ हे इंग्रजी संगीत नाटक सादर केले आहे. दोन तासांच्या अवधीत संपूर्ण गांधी चरित्र संगीताच्या माध्यमातून सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. पण हे नाटक पाहिल्यानंतर त्याच्या यशस्वी प्रयोगाने मन प्रसन्न होते आणि आश्चर्यचकितही! मुंबईच्या…
Read More