स्वातंत्र्यवीर सावरकर….इंद्रधनुष्यासम शोभिवंत चमत्कार…. एक उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न लेखक, उत्तुंग कल्पनाविलासी कवी, दशसहस्रेषु वक्ता, इतिहासकार, बुद्धि-निष्ठ विचारवंत, क्रियाशील समाज क्रांतिकारक…. किती पैलू वर्णावे. सावरकरांच्या या अनेक पैलूंवर भरपूर लिहिलं गेलंय आणि जाईल. जितकं लिहावं, वर्णावं, बोलावं तितकं कमी पडेल असं त्यांचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतं. पण त्यांच्या जीवनपटाचा जितका अभ्यास करू तितका एक मुद्दा ठळकपणे समोर येतो आणि तो म्हणजे, ‘ते मुळात एक संपूर्ण क्रांतिकारक होते.’ सर्वसाधारणत: क्रांतिकारक हा शब्द आपण देशभक्ती आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात योजतो. पण सावरकरांच्या अनेक विषयातल्या विचार आणि कृती अभ्यासल्या तर या शब्दाची खरी व्याप्ती…
Read MoreDay: December 12, 2017
पुण्यस्मरण – स्वातंत्र्यवीर सावरकर : एक अविस्मरणीय पुरुषार्थ !
हिंदू समाजाचे संघटन हा, तर स्वातंत्र्यवीरांचा ध्यास होता. अर्थात याबाबतचा त्यांचा विचार जेवढा मूलगामी होता त्यापेक्षाही तो कमालीचा व्यापक व चौफेर होता. हिंदू समाजाला श्रुतिस्मृतिपुराणोक्त काळातून अद्ययावत काळाकडे वेळ पडल्यास हाडाची कांडे करून आणलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचर्चा प्रवर्तते’ हे जेवढे खरे आहे तद्वतच शास्त्रचर्चा केल्याशिवाय राष्ट्रधारणेची व रक्षणेची सिद्ध-ताही अचूकतेने होऊ शकणार नाही हेही तात्यारावांनी वेळीच व सावधानतेने हेरलेले होते. – सुरेश सावंत, भाजप नेते, पनवेल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच जणूकाही अचाट साहस, अफाट धाडस, अतुलनीय देशप्रेम, जाज्ज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अनिवार स्वातंत्र्याकांक्षा, स्वदेश संरक्षण सिद्ध-तेची कमाल…
Read Moreसंन्यासी मुख्यमंत्री
– सतीश सिन्नरकर, संपादक २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत वृत्त माध्यमांनी खोलवर लक्ष घातले. बहुतेकजण ‘मोदीं’च्या पराभवाची ंिकवा नामुष्कीची जणु वाट पहात होते. दिल्ली व बिहारने तशी संधी त्यांना मिळाली देखिल व त्या त्या वेळेस मोदींना झोडपण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. अशाच अपेक्षेने गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे मीडियाचे लक्ष होते. पण निकालाच्या दिवशी सरसावून बसलेल्या सर्व पत्रकारांची पूर्ण निराशा झाली. मतदारांनी भाजपला एवढे भरभरून यश दिले की तीन चतुर्थांश जागा ंिजकून भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली. पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापून भाजपने विरोधकांची बोलती बंद केली.…
Read Moreआरएसएस / हिंदुत्त्व
हिंदू राष्ट्राचे द्रष्टे डॉ. हेडगेवार … आणि रामदासी बाण्याप्रमाणे सर्व काही ‘परीक्षून सोडावे’ या दंडाकानुसार त्यांनी सर्व प्रचार-पद्ध-तींतून सुलभ पण परिणामकारक अशी पद्ध-ती शोधून काढली. श्रीसमर्थ रामदासांनी आपल्या ग्रंथांतून संघटनेची जी मार्मिक धोरणे सांगून ठेवली आहेत, तशाच धोरणांनी डॉ. हेडगेवार यांनी काम केले. उदाहरणार्थ ‘ओळखीने ओळखी साधावी’, ‘महंते महंत करावे, युक्तिबुद्ध-ीने भरावे’, ‘राखावी बहुतांची अंतरे’, इत्यादी वचनांतून प्रकट झालेली धोरणे नि रा.स्व. संघाच्या प्रसाराची पद्ध-ती ही बहुतांशी एकच होती असे दिसून येईल (प्रस्तुत लेख ‘केशव बळीराम हेडगेवार’, संकलन गोपाळ गोंिवद अधिकारी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे. संपा). – ग. वि.…
Read Moreशुभ संकल्पाचा सण गुढी पाडवा
गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगल मुहूर्त आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खऱ्या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, बंगला खरेदी करणे, नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे, जमीन, प्लॉट खरेदी इतकेच काय, पण वाहन खरेदी, सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम व आदर्श मानला जातो. ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्वदोष काही प्रमाणात कमी होतो. शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी : ढी पाडव्याला घराची…
Read Moreकम्युनिस्ट दहशतवादाचा भयानक चेहरा !
– शरद मेस्त्री. दहशतवाद म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते जम्मू-काश्मीर; परंतु तेवढाच भयावह, त्यापेक्षाही अधिक आणि क्रूर दहशतवाद केरळमध्ये कम्युनिस्टांचा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये किमान त्यांची घटना आणि कायदे तरी वेगळे आहेत. येथे तर आपली घटना लागू असून तरतुदींचीही पायमल्ली होते. तरीही कोठेही वाच्यता नाही. केवळ आपलेच विचार आणि आचार महत्त्वाचे असून अन्य विचार ंिकवा कृती त्यांच्या साम्राज्यात आलेले त्यांना रुचत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना यमलोकी पाठविण्यात येते. या विचारांना विरोध कराल, तर मृत्यूला तयार राहा, अशीच अराजकता देशातील या सर्वोच्च सुशिक्षित राज्यात आहे. केरळ म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण.…
Read Moreआर्थिक वृद्धिसाठी पायाभूत सुविधांवर भर
२०१७-१८च्या अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या ‘यंग डेव्हलंिपग इंडिया’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतूक पायाभूत प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रस्ते, रेल्वे व नद्या या देशाच्या जीवनवाहिन्यांना प्राधान्य दिले आहे. नव्या वाहतूक सोयी निर्माण होण्यासाठी २ लाख ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. -प्रतिनिधी भारताच्या प्रगतीत जर पायाभूत सुविधा पुरेशा नसतील, तर अडचणीचे ठरू शकते. सध्याच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट´ीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्या वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य दिलेले आहे. काही काळापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व…
Read Moreनाट्यरंग – मुघले आझमचा अभूतपूर्व नाट्याविष्कार
– सतीश सिन्नरकर. हिन्दी सिनेमाच्या इतिहासात ‘मुघले आझम’ सिनेमाची निर्मिती म्हणजे एक महद् आश्चर्य मानले जाते. के. असिफ यांनी आपले सर्वस्व ओतून सतत ९ वर्षे मेहनत केली व हा अद्वितीय चित्रपट बनविला. त्या काळच्या चित्रपट निर्मितीच्या खर्चाचा विचार केला तर मुघले आझमचा खर्च किमान १०० पट जास्त झाला. या सिनेमाची कहाणी म्हणजे एक स्वप्ननगरी असून प्रत्येक बाबतीत तिचे अनोखेपण अधोरेखित होते. पहिला सिनेमा कृष्णधवल असूनही २५ आठवडे सतत चालला व त्यानंतर ४४ वर्षांनी २००४ मध्ये हा चित्रपट रंगीत केला त्यावेळीही तो २५ आठवडे चालून त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले. हा सिनेमा…
Read More…आता निषेध नको; ठोस कृती करा!
– शरद मेस्त्री मुंबईत एकेकाळी गुंडाराज माजले होते पण काही काळानंतर पोलिसांनी एकएका गुंडाना वेचून वेचून ठार मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे गुंडाराज आपोआप बंद झाले. या नक्षल्यांचे, माओवाद्यांचे व काश्मीरातील दंगेखोरांचे असेच केले पाहिजे. एकदा जबरदस्त धाक बसला की मग पुढे कुणी डोके वर काढणार नाही. येणाऱ्या काळात मोदी अशी कृती करतील का? छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पंचवीस जवानांची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राहून, त्या देशातीलच कायदे-कानून न पाळता आपल्या काही मागण्यांसाठी हाती शस्त्र घेऊन…
Read More‘गांधी – द म्युझिकल’ : प्रभावी संगीत नाटक
आपल्याकडे काही विषय असे आहेत की त्यावर प्रत्येक कलेच्या माध्यमातून सादरीकरण करता येते. महात्मा गांधी यांच्यावर आजपर्यंत पुस्तके, कविता, सिनेमा, नाटके सर्व झाली आहेत. पण या विषयावर संगीत नाटक होऊ शकते असा मात्र कधी विचार कोणाही कलाकाराच्या मनात आला नसेल. पण हे आव्हान दानेश खंबाटा या व्यक्तीने स्वीकारून त्याचे लेखन व दिग्दर्शन करीत ‘गांधी-द म्युझिकल’ हे इंग्रजी संगीत नाटक सादर केले आहे. दोन तासांच्या अवधीत संपूर्ण गांधी चरित्र संगीताच्या माध्यमातून सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. पण हे नाटक पाहिल्यानंतर त्याच्या यशस्वी प्रयोगाने मन प्रसन्न होते आणि आश्चर्यचकितही! मुंबईच्या…
Read More