पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होता..! मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आजही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..! दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलम लावतोय, युध्द खेळतोय..!! आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं…
Read MoreDay: December 12, 2017
कथा – संस्कार
भा. ल. महाबळ ‘‘ए टवळे, हिंिडबे, चहा आण.’’ नरेंद्र ओरडला. ‘‘आणते, आलेच.’’ नेहानं विसरतेपणी सरळ उत्तर दिलं. ‘‘नेहा, तुला वरणभातातील, मनूवादी भाषेत बोलायचं असेल तर मला तुझा चहा नको, तो मोरीत ओतून दे. असं पिचपिचीत बोलत राहिलीस तर खिडक्यांच्या काचांवर हजारो रुपये, पुढील वर्षांत खर्चावे लागतील. पैशाचं एक सोड, पण आपल्या भावी बाळाचा विचार कर. तोही स्वच्छ, सरळ, मनूवादी भाषा बोलेल. त्याचा या जगात काय निभाव लागेल?’’ ‘‘सॉरी, मी विसरले. ए मुडद्या, चहा प्यायचा असेल तर घे, नाहीतर उलथ. उकिरडा फुंक्या मेला!’’ नेहानं चहाचा कप टेबलावर मुद्दाम हलवला. ‘‘अगं उंडगे,…
Read Moreपरशुराम जयंती विशेष
परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार – कमलाकर तांबे परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. आईवडील – परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला. कार्य – अधम अशा क्षत्रियांचा वध : ‘वाल्मीकीने त्याला ‘क्षत्रविमर्दन’ न म्हणता ‘राजविमर्दन’ म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’ कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व…
Read Moreरोगांवर घरगुती उपचार
– वैद्य निर्मला ग. जोशी माजी रीडर व प्रमुख, प्रसूती तंत्र विभाग, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी आयुर्वेदिक कन्सेप्ट्स इन गायनॉकॉलॉजी या पुस्तकाच्या लेखिका ‘गृहिनी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. पोषण, शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. वैद्यकीय प्रतिष्ठा यांच्या स्पर्धेतच बहुशः गुंतली आहे. तेव्हा गृहिणीनंच थोड्या धिटाईनं आजीबाईचा बटवा हातात घेतला पाहिजे. बटवा आजीबाईचा असला तरी ती…
Read Moreमहिलांविषयी अनादर
गेल्या काही दिवसांत देशभरात विशेषत: महाराष्ट्रात महिलांना अनादराने वागवण्याचे काही घृणास्पद प्रकार उघडकीस आले आहेत. या सगळ्या प्रकाराकडे पाहिले म्हणजे शिक्षणात आघाडीवर असलेला महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत किती असहिष्णु होत चाललेला आहे याचे प्रत्यंतर येते. या प्रत्येक प्रकरणामध्ये महिलांची छेड काढणे, त्यांची बेईज्जत करणे, त्यांना अनुदारपणे वागवणे आणि गुन्हेगार समजून त्यांना हीन वागणूक देणे असे प्रकार घडलेले आहेत. उस्मानाबाद येथे १४ वर्षे वयाच्या एका मुलीने, तिच्याच सावत्र मामाने छेडाछेडी केल्यामुळे बेइज्जत होईल, या भयाने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी काही दिवस मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकरणामध्ये विनयभंग किंवा बलात्कार…
Read Moreरहस्य भारतीय सौंदर्याचे
– गीताजंली ताम्हाणे भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही साऱ्या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत. कारण या सौंदर्य प्रसाधनांना पैसा फार लागत नाही. ती घरीच तयार केली जातात आणि त्यातल्या एखाद्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर चुकला तरीही त्याची कसलीही रिऍक्शन येत नाही. ीभारतीय सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारी सामुग्री आपल्या दारात असते, आजीबाईच्या बटव्यात असते नाहीतर आपल्या स्वयंपाकघरातल्या तिखटामिठाच्या डब्यात तरी असते. यातली कोणतीही वस्तू आपल्या शरीराशी विसंगत नाही. एवढी सोपी ही सौंदर्य प्रसाधने केवळ सौंदर्यच वाढवतात असे नाही तर ती आपल्या आरोग्यालाही हितकारक असतात. औषधी म्हणनही…
Read Moreमहत्त्वाच्या औषधी वनस्पती
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत. – वैद्य सुशांत काळे १. कडूनिंब हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक…
Read Moreवाटा यशाच्या
कसे निवडाल? कोणतेही करियर ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. जे क्षेत्र निवडायचे त्याबद्दलचे प्रेम, त्या क्षेत्रात पडेल तितके काम करण्याची आवड आणि तयारी असणे आवश्यक आहे. उदा. आज एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरवर आठ तास काम करणे आवडत असेल तर त्याला पुढे कॉम्प्युटरचा अभ्यास करणे, त्याच क्षेत्रात नोकरी करणे सोपे जाईल. जे क्षेत्र निवडाल, त्यात यश मिळवण्यासाठी त्यांनी स्वत:ला सिध्द करायला हवे. जन्मजात गुणवत्ता – उदा. प्रत्येक व्यक्तीला उत्तम गाता किंवा चित्र काढता येत नाही. व्यावसायिक कलाकार बनायचे असेल तर तुमच्यात जन्मजात गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर गुणवत्तेला जोड देणारे…
Read Moreकोकणच्या समृद्धीचे स्वप्न
सतीश सिन्नरकर, संपादक सह्याद्रीच्या कडे-कपारीत पहुडलेला…अरबी समुद्राचा नितळ…निळेशार किनारा लाभलेला…माडा-पोफळींच्या, गर्द आमराईच्या बागांचा हिरवा साज ल्यालेला…आंबा, काजू, फणस यासारख्या विविध फळांच्या रानमेव्याचा…रानफुलांच्या रानगंधाचा…ओल्या-सुक्या मासळींचा…विविध बोलींचा, लोककलांचा…परंपरागत जपलेल्या संस्कृतींचा…आपलेपणाच्या ओढीचा…शहाळ्यातील पाण्याच्या गोडीचा…ज्या भूमीने अनेक नररत्ने दिली अशा शूरवीरांचा…गड आणि किल्ले यांतून इतिहासाची साक्ष देणारा… लालमातीचा टिळा लावून पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणारा…कोकणी बाण्याचा…निसर्गाच्या अनुपम लावण्याने मोहवणारा…असा हा कोकणाचा परिसर म्हणजे जणू सृष्टिसौंदर्याचं कोंदणच! खरच…हे नयनरम्य कोकण…भविष्यात नक्की कसं असेल?…काय आणि कसा असेल कोकणचा चेहरा-मोहरा? धावत्या युगात काळाची गणितं दिवसागणिक बदलत जातात. जगण्याची समीकरणं बदलतात…वेगवेगळे प्रवाह येतात…या सा-या प्रवासात माझं कोकण कोणतं रुप…
Read Moreकोकणचा विकास व्हायचा असेल तर मानसिकता बदलायला हवी!
कोकणातली जी काही डेव्हलपमेंट झाली आहे ना ती तेथील लोकांनी आपली स्वत:ची गरज म्हणून केलेली आहे. यात शासनाने काहीही केलेले नाही. शासनाने दाखवावेत कोकणात त्यांनी किती उद्योजक, व्यावसायिक निर्माण केलेले ते… आम्ही समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. कोकणात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. छोट्या छोट्या…. पण सरकारला तसे करायचेच नाही. त्यांना डायरेक्ट अशी सिवर्ल्ड, मरिनपार्क सारखीच मोठीमोठी स्वप्ने पडतात व अर्धवट राहतात, लोकांचा विरोध होतो. – कृष्णा केसरकर आपले बालपण व शिक्षण याविषयी सांगा? मी कृष्णा गजानन केसरकर, मु.पो. माणगाव, सिंधुदुर्ग. माझे आईवडील तेथेच राहतात. माझे शिक्षण माणगावातच झाले. आई…
Read More