केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सात नोव्हेंबर रोजी कोलाड येथे कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत असतानाच विद्युतीकरणाचे कामही लवकरच सुरू होत आहे. त्याच बरोबर कोकण रेल्वेचे अन्य प्रकल्पही मार्गी लागत आहेत.कोकणातील दिघी आणि जयगड बंदरं कोकण रेल्वेशी जोडण्याच्या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. अलिबागला आरसीएफच्या रेल्वे मार्गाने मुंबईला जोडण्याची कल्पनाही प्रत्यक्षात येऊ घातली आहे.उरण रेल्वेचं अनेक वर्षे रखडलेले काम सुरू होत असून रत्नागिरी किंवा राजापूर पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रकल्पावर रेल्वे गंभीरपणे विचार करीत आहे. थोडक्यात कोकणात रेल्वेचं जाळं विणण्याचं प्रभू यांनी नक्की केलेलं…
Read MoreDay: December 11, 2017
पारंपरिक पिकांना व्यावसायिकतेची जोड
काळीमिरी, दालचिनी, जायफळ व लवंग यासारखी किमती मसाला पिके कोकणामध्ये उत्कृष्ट प्रकारे येऊ शकतात हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. जायफळाच्या ‘कोकण स्वाद’, ‘कोकण सुगंधा’, ‘कोकण श्रीमंत’ तर दालचिनीच्या ‘कोकण तेज’ व ‘कोकणात शक्य तेथे नारळ, सुपारी बागांमध्ये होणे आवश्यक आहे. ही पिके कोकणातल्या शेतकऱ्याला उत्तम प्रकारे आर्थिक स्थिरता देऊ शकतात. – डॉ. किसन लवांडे नारळ आणि सुपारी ही कोकणातील मुख्य बागायती पिके आहेत. नारळाखाली सुमारे ३३,००० हेक्टर इतके तर सुपारीखाली ३५०० हेक्टर इतके क्षेत्र कोकणामध्ये आहे. कोकणातील बदलत्या हवामानाला समर्पकपणे प्रतिसाद देणाऱ्या पिकापैकी नारळ हे एक पीक आहे. मात्र नारळाची…
Read Moreअभिनव भारतचे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतील आधारस्तंभ देशभक्त बॅरिस्टर सरदारसिंह राणा मवाळ कामात न रमणारे राणा !
भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात राहून कार्य करणारे अनेक देशभक्त होऊन गेले आहेत. त्यांच्या परदेशातील या देशकार्याचे फळ त्यांना काय मिळाले? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे देशभक्त जिवंत आहेत का ? त्यांचे कुटुंबीय कोण किंवा त्यांच्या स्वदेशप्रेमाच्या अनावर भावनांना लगाम घालत त्यांनी परकीय भूमीवर कसे आयुष्य कंठले? याची विचारपूस करणे तर दूरच; पण सत्तेवर आलेल्या काँग्रेसने त्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे, हालअपेष्टा भोगणारे किंवा कारावासात अनेक काळ घालवलेले सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतीवीर जसे पडद्याआडच राहिले, तसेच काहीसे या परदेशात राहिलेल्या देशभक्तांचे झाले. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, वीरेंद्र…
Read Moreपाकिस्तानी युद्ध-नौका गाझीची पारध करणारे भारतीय नौकाधिपती नीळकंठ कृष्णन !
१९७१ च्या बांगलादेश युद्ध-ात भारतीय नौदलाने पाकिस्तानची गाझी पाणबुडी बुडवून आणि कराची धक्क्यावर (बंदरावर) छोट्या; पण वेगवान क्षेपणास्त्र नौकांनी आक्रमण करून अपूर्व कर्तव्याचे (कामगिरी) पालन केले (बजावले) होते. नौदलासाठी छोट्या क्षेपणास्त्र नौका अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, हे बांगलादेश युद्ध-ाच्या काही वर्षे आधीच नौदल विकासाचा आराखडा सिद्ध- करणाऱ्या नावाधिपती (अॅडमिरल) कृष्णन यांच्या लक्षात आले होते आणि त्यांनी संरक्षण खात्याकडे या नौका विकत घेण्याची जोरदार प्रशस्ती (शिफारस) केली होती. एवढेच नाही, तर पुढे या नौका विकत घेण्यासाठी प्रारंभिक बोलणी त्यांनीच रशियन आरमाराचे प्रमुख ग्रँड अॅडमिरल गॉर्शकॉव्ह यांच्याशी केली होती. त्यानंतर मुंबईत नौदलाच्या…
Read Moreझुंजार क्रांतिकारक हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल !
भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते ‘बिना खड्ग’ बिना ढाल नव्हे’, तर सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या रक्तरंजीत बलिदानाने ! रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील झुंजार क्रांतीकारक हुतात्मा भाई ऊर्फ अण्णासाहेब ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे यांपैकीच एक थोर क्रांतीकारक! कचेरीत गोरा साहेब सकाळी येई. सर्वजण उठून त्याला सलाम करत. त्यांना ही गोष्ट खटकू लागली. एक दिवस साहेब आल्यावर आण्णा वर्तमानपत्र वाचत राहिले. साहेबाने जाब विचारल्यावर ते म्हणाले, ‘मला माझ्या कामाचे वेतन मिळते, सॅल्यूट ठोकण्याचे नाही.’ साहेबाला कोतवालांचे उद्ध-ट वर्तन आवडले नाही. तो त्यांना म्हणाला, ‘गेटआऊट !’ तेव्हा ते म्हणाले, ‘आम्हीच तुम्हाला हिंदुस्थानातून गेटआऊट करणार…
Read Moreदेशभक्ती – आझाद हिंद सेना क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुष
सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध- सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी, त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा, हा आज भारताचा राष्ट´ीय नारा बनला आहे. मध्ये अमेरिकन पत्रकार लुई पाश्चर ह्यांच्याशी चर्चा करताना, महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता, की काही जाणकार असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर कदाचित भारताची फाळणी न होता, भारत एकसंध राष्ट´ म्हणून टिकून…
Read Moreनेताजी, बाळासाहेब आणि हिंदुत्व!
२३ जानेवारी, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. याच दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीपासून हा दिवस ‘देशभक्ती दिन’ म्हणून साजरा केला जातोय. या दिनाचे औचित्य साधून आम्ही ‘महानगरी वार्ताहर’चा ‘देशभक्ती विशेषांक’ आपल्या हाती देत आहोत. यात ज्ञात-अज्ञात अशा अनेक देशभक्त क्रांतिकारकांची प्रेरक अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चित्रपटातील ‘देशभक्ती गीते’ हा स्वातंत्र्यकाळापासूनच्या चित्रपटांपासून १९९०-९५ पर्यंतच्या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्यांचा अभ्यासपूर्ण असा आढावा घेणारा लेख, ‘चीन-भारत युद्ध-ां’ची वास्तवता दर्शविणारा लेख, ‘बेगडी देशभक्त’ हा देशभक्तीच्या बदललेल्या आयामांचे वास्तव विशद करणारा लेख, नेताजी सुभाषचंद्रांनी भारताच्या…
Read Moreराजधानीत राजभाषेची दुर्दशा व उपाय
– सतीश सिन्नरकर परवाच सामाजिक क्षेत्रात देशभर वावरणाऱ्या एका वयस्क व्यक्तीची भेट झाली. हे सतत मुंबईचा उल्लेख बंबई करत होते आणि ऐकणाऱ्यांमध्ये कोणीच त्यांना अडवत नव्हते. शेवटी मी त्यांना मध्येच थांबवून मुंबई म्हणण्याची विनंती केली. ती त्यांनी लगेच स्वीकारली पण आजुबाजूच्या इतर अमराठी लोकांना मात्र तो माझा आगाऊपणा वाटला. अशीच एक भेट मुंबईतील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली. या संस्थेत २५०००विद्यार्थी आहेत. सर्व इंग्रजी माध्यम. मराठी शाळा होती. पण हळूहळू योजनापूर्वक बंद केली. पुरेसे विद्यार्थी नाहीत असे सांगत व स्थानिक मराठी अभिमानी नेत्यांचे ‘सहकार्य’ घेत दरवर्षी एकेक…
Read Moreमराठी भाषेची उपेक्षा
मराठी भाषेचा हा मागासलेपणा मात्र मुंबई महानगर पालिकेतील गुजराती, कन्नड, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना फारच लवकर पडला. त्यामुळे मराठी भाषेला फालतू ठरवून दुसरी भाषा म्हणून या शाळांनी हिंदीसारख्या प्रगत भाषेचा अंगिकार केला व मराठीला हुसकून लावले. मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळाही हिंदीला पसंत करतात. असा हा महाराष्ट्रातल्या अन्य भाषांचा, भाषिकांचा महिमा आहे. अन्य प्रांतात त्या – त्या भाषांचा, मातृभाषांचा व इंग्रजीचाच अभ्यास होतो. उत्तर भारतात हिंदी – इंग्रजी व दक्षिण भारतात मातृभाषा आणि इंग्रजी अशी पसंती असते. महाराष्ट्रात इंग्रजी, हिंदी थोडीफार जागा मिळालीच तर मराठीला. – सुरेश सावंत भाजप नेते, पनवेल…
Read Moreश्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज
श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला आहेत.ही स्थाने फार प्रसिध्द आहेत.श्री दत्त संप्रदायामध्ये या स्थानांना फार महत्त्व आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मगांव पीठापूरम (आंध्रप्रदेश) व कर्मभूमी कुरवपूर (कर्नाटक) ही स्थाने श्री. प. प. टेंब्ये स्वामीमहाराजांनी शोधून प्रसिध्दीस आणली.तसेच श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा’ हा महामंत्र पुनरूज्जीवित केला.तसेच श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान लाड कारंजा, (जि. वाशिम) हे ही त्यांनी शोधून…
Read More