मराठी आणि नवीन इंग्रज

marathi-and-new-english

– शरद मेस्त्री राष्ट्रीय एकात्मता ही केवळ महाराष्ट्रनेच राबवायची गोष्ट नाही. आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मता एक भोंगळ गोष्ट आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने सतत लक्षात ठेवले पाहिजे. या देशातील सर्व स्तरावरील सत्ताधीश हे स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यातच गर्क आहेत; तेवढे ते मतलबी आहेत. त्यांना फक्त नेतृत्व टिकावयाचे आहे. एखाद्या तत्त्वाचा अंगीकार करणारी ही मंडळी नाहीत. वारा फिरेल तशी पाठ फिरवून मतलब साधणारी ही मंडळी आहेत. आणखी दहा वर्षांनी दुर्दैवाने खेळ पाहण्यापेक्षा आजच मराठी भाषेच्या अध्यापनाचा, माध्यमाचा आग्रह धरला पाहिजे. मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती…

Read More

समर्थांचे शब्दसामर्थ्य

samartha-s-words

– डॉ. साधना सुधाकर गोखले समर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती जी सदासर्वदा जागृत असे. मनोबोध, अभंगगाथा, करुणाष्टके, असंख्य पदे, सवाया, डफगाणी, पोवाडे, आरत्या, आख्यान काव्ये, आत्माराम, दासबोध असे समर्थांचे अफाट साहित्य असले तरी ‘आत्माराम’ दासबोध ‘माझे रूप स्वत: सिद्ध-’ असे त्यांनी स्वत:च म्हटले असल्याने प्रामुख्याने दासबोध ही त्यांची ‘वाङ्मयीन मूर्ती’ आहे. दासबोधात एकूण वीस दशके आहेत. प्रत्येक दशकाचे दहा समास असे वीस दशकांचे दोनशे समास आहेत. यातील ओवीसंख्या ७७५१ इतकी आहे. समर्थांनी जे जे अनुभविले ते ते सारे यातून व्यक्त झाले आहे. त्यांचे प्रतिपादन सरळ आणि मराठी रोखठोक आहे. विषय…

Read More

टोकीओची रस्ते – सुरक्षा संस्कृती

tokyo-s-road-safety-culture

इथं वाहक चालणाऱ्यांना श्रेष्ठ मानतात अशी संस्कृती आहे इथली. सिग्नलवर पादचारी रस्ता ओलांडताना वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांना तेथून पुढे जायची परवानगी असते परंतु वाहक नेहमीच पादचाऱ्यांना आधी जाऊ देतो. ती लांबलचक भव्य गाडी सहजच अदबीने मागे थांबताना तुम्हाला अदबीने रस्ता ओलांडायची विनंती करीत असते. गाडीवाला अरेरावीत आधी पुढे निघून गेलाय असं एकदाही माझ्या पाहण्यात आलेलं नाही. नियमाप्रमाणे त्याला जायचा अधिकार आहे. परंतु पादचाऱ्यांना श्रेष्ठ मानणं हे वर्षान् वर्षाच्या त्यांच्या उच्च संस्कृतीवरून आलं असलं पाहिजे. -नि.श. गुळवणी, जपान झं सारं बालपण सत्तरच्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात सोळांकूरात अगदी मजेत…

Read More

वास्तुदोष निवारणाचे उपाय

vastudosh-prevention-measures

घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाहीत. हा आपला गैरसमज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात. आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपऱ्यात ठेवावे. आपल्या शयनकक्षात खरकटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते. कुटुंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे. कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे. घरातील पुरूष हे…

Read More

वास्तुशास्त्राचे वैज्ञानिक महत्त्व

scientific-importance-of-vastu-shastra

वास्तुशास्त्राच्या आधारे घर बांधल्याने जीवनात सुख, शांती व समृद्धि येते. ऋषिमुनींनी वास्तुशास्त्राचा संबंध धर्माशी जोडला आहे. याचे कारण नागरिकांनी त्याचा अवलंब करावा हे आहे. मात्र, धर्मासोबत वास्तुशास्त्र नियम Fषींनी मोठी तपश्चर्या करून अनुभवाच्या जोरावर तयार केले आहे. आजच्या विज्ञानाच्या परीक्षेत हे नियम खरे ठरतात. -दिनकर साळगावे घर बांधताना आपण आधी हे विचारात घेतले पाहिजे, की निसर्ग व मानव यांचा समन्वय साधला जाऊन मानवाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आरोग्यदायी जीवन लाभावे तसेच जीवनातील सर्व दु:खांचा नाश होऊन सुख लाभावे. पृथ्वी स्वत:भोवती फिरून सूर्याच्या चहूबाजूंनी प्रदक्षिणा मारते, त्यावेळी मानव उत्तरायण व दक्षिणायणाच्या…

Read More

होली | मनातील अपप्रवृत्तीचे दहन करणारी होलीकोत्सव

holikosav

देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट´ात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतगमनोत्सव’ म्हणजे वसंत Fतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलतः अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच…

Read More

अवघे ७५ वयमान!

only-75

सतीश सिन्नरकर, संपादक चिरतरूण श्री. सुभाष देसाई यांचे वर्णन करताना जे वरील शब्द योजिले आहेत ते अत्यंत सकारात्मक भावनेने लिहिले आहेत. या अंकाच्या निमित्ताने ज्यांच्याशी बोलणे झाले त्या सर्वांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, ‘काय म्हणता? देसाई साहेबांचे वय ७५ आहे? अहो, अजिबात वाटत नाही’ असे आश्चर्याचे उद्गार काढून मग ते कसे तत्पर आहेत, त्यांनी आपली तब्येत कशी मेन्टेन केली आहे आणि दररोज योग व व्यायाम केल्याशिवाय त्यांचा दिवस कसा पुरा होत नाही वगैरे चर्चा होत राहते. गेली ५० ते ६० वर्षे वैयक्तिक व सामाजिक जीवनात श्री. देसाई हे ज्या तडफेने अहोरात्र…

Read More

सध्याची शिक्षणपद्ध-ती किती रोजगाराभिमुख?

present-education-system-how-much-employment-oriented-is-it

अभ्यासक्रमासाठी नेमलेले विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हा दोष आपल्या शिक्षणपद्ध-तीत आढळतो. विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.  इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणाऱ्या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते. त्यामुळेच असेल कदाचित. पण परीक्षेत उत्तम गुण…

Read More

ज्ञानाधिष्ठित उद्योगांच्या जाळ्यातून महाराष्ट्राचा विकास शक्य

development-of-maharashtra

महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अग्रेसर होताच; मात्र हे स्थान टिकवून ठेवून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी निश्चितच ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबतीमध्ये एक होऊन महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. – शरद मेस्त्री आपापल्या राज्यातील शास्त्रज्ञांचा, संस्थांचा खुबीने उपयोग करून घेत शेजारी राज्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. या स्थितीत संस्थांना स्वायत्तता, भक्कम आर्थिक पाठबळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊनच महाराष्ट´ाला आपले स्थान टिकवता येईल. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट´ाचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. भारतातील पहिल्या…

Read More

कामाचा ताण, कौटुंबिक समस्या व बेरोजगारी

work-stress-family-problems-and-unemployment

गेल्या २५ वर्षांत जागतिकीकरण आणि खाजगीकरणामुळे नोकरदारांच्या जीवनपद्ध-तीत अमूलाग्र बदल झाला आहे. सर्वच उद्योग, व्यवसाय, आस्थापनांच्या कार्यालयात ‘कामाची वेळ काटेकोरपणे पाळली जात आहे,’ असं चित्र नाही. पूर्वी साडेसहा, आठ तास ड्युटी असायची. अनेक ठिकाणी कार्यालयीन कामाचा हा नियम नीटपणे पाळला जायता. आजमात्र कमीत कमी कामगार कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची व्यवस्थापनाची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही वाढीव वेतन वा भत्त्याशिवाय कर्मचाऱ्यांना १२-१२/१४-१४ तास काम करावं लागत आहे. शिवाय निवासाचं ठिकाण नोकरीच्या ठिकाणापासून दूर असल्यामुळे प्रवासातही माणसांचा वेळ अधिक जातो. नोकरी टिकविण्याच्या आणि पैसे कमविण्याच्या या धडपडीमुळे माणसांच्या आणि समाजाच्या…

Read More