बेभरवशाच्या आरटीपिसिआर चाचण्या

एका महत्वाच्या कायदेशीर कारवाई मधे असे दिसून आले आहे की कोविड चाचण्या किंवा आरटीपीसीआर चाचण्या बेभरवशाच्या आहेत. पीटर अन्डरयु हे आयरिश गृहस्थ विज्ञान पत्रकार असून त्यांनी जीवशास्त्र शाखेतून शिक्षण घेतले आहे. आणि जेनेटिक्स मध्ये पदवी घेतली आहे. काही पर्यटकांचे बेकायदेशीर पणे विलगीकरण करण्यात आल्याने त्यांनी 97% आरटीपीसीआर चाचण्या बेभरवशाच्या आहेत असे सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला पोर्तुगीज न्यायालयातील न्यायाधीशांनी अशा एका निर्णयाला मान्यता दिली ज्यामुळे, सुट्टी मजेत घालवायला आलेल्या आणि कोविड नसलेल्या काही पर्यटकांना बळजबरीने विलगीकरणात रहावे लागले. म्हणून आरटीपीसीआर चाचण्यांच्या विश्वासार्हते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे 4 पर्यटकांनी…

Read More

मोदी यांचे आक्रमक नेतृत्त्व

आपल्या लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे – रजत मित्रा ‘‘हे नक्कीच त्याला गोत्यात आणू शकेल. हे त्याने का केले हे त्याला खूप समजावून सांगावे लागेल’’. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेविषयी बोलताना माझ्या प्रोफेसर मित्राच्या आवाजातील आनंद स्पष्टपणे जाणवत होता. मोदींचा त्रास अजूनच वाढला आहे हे पाहून त्याला आनंद होत होता. खरंतर तो विघ्नसंतोषी आहे. पण आजकालच्या परिस्थितीत तो एकटाच नाही. सभोवताली असे बरेच लोक आहेत ज्यांना साथीच्या रोगाची काळजी कमी आणि मोदींच्या भवितव्याची काळजी जास्त वाटते. एका साध्या सरळ माणसासाठी या टोकाच्या द्वेषाचे मूळ काय असू शकते? ते सुद्धा अशा…

Read More

“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’

“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’ तर्फे आपले संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठी समर्पित करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बोरिवलीचे आमदार श्री. सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विट्टी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोरोना महामारीच्या या कठीण काळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावले आहे. या दरम्यान अनेक डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा डॉक्टरांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच “राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने…

Read More

ज्ञानाधिष्ठित उद्योगांच्या जाळ्यातून महाराष्ट्राचा विकास शक्य

development-of-maharashtra

महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अग्रेसर होताच; मात्र हे स्थान टिकवून ठेवून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी निश्चितच ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबतीमध्ये एक होऊन महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. – शरद मेस्त्री आपापल्या राज्यातील शास्त्रज्ञांचा, संस्थांचा खुबीने उपयोग करून घेत शेजारी राज्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. या स्थितीत संस्थांना स्वायत्तता, भक्कम आर्थिक पाठबळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊनच महाराष्ट´ाला आपले स्थान टिकवता येईल. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट´ाचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. भारतातील पहिल्या…

Read More

Kuldevta – diwali 2017

आपली देवस्थाने फार प्राचीन काळापासून उभी आहेत. प्रत्येक देवस्थानास इतिहास आहे. ती उभी राहण्यामागे काही कथा आहेत. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व वेगवेगळे आहे. या कुलदेवतांबाबत म्हणाल तर देवता अशी एकच लक्षात आली आणि ती म्हणजे ‘पार्वती’. मात्र या पार्वतीने वेळोवेळी निरनिराळी रूपे घेऊन भक्तांना आधार दिलेला आहे. भक्तांची संकटे दूर केलेली आहेत आणि तिची निरनिराळ्या ठिकाणी श्रद्ध-ास्थाने निर्माण झाली आहेत. संस्कृतीच्या प्रभावाने व्यक्तिमत्त्व घडते व त्यातूनच जीवन सफल पावते. या प्रक्रियेत कुलदेवतेचे महत्त्व अपार आहे. आयुष्यात शक्ती, धन, विद्या व भक्ती यांची प्रेरणा आपणास आपल्या कुलदेवतेपासून मिळत असते. म्हणूनच आदिशक्ती, आदिमाया…

Read More

आई

aai

‘गर्भातून पिल्लू बाहेर येते आणि त्याचक्षणी एका आईचा ‘जन्म’ होतो. आई होण्यासाठी आतुरलेली स्री, आई होतानाचे सर्व कष्ट सोसते आणि आई झाल्यावर आयुष्यभर आनंदाने आपले ‘आईपण’ जगते. मूल वाढविण्याचे तिचे प्रयत्न यशस्वी झाले तरी टाळ्या वाजविणारे फारसे नसतात. पण मूल बिघडले तर मात्र तिचा उद्ध-ार झाल्याशिवाय रहात नाही. हे आईपण चिकाटी शिकविते, सहनशक्ती वाढवते, अभिनय करायला लावते, आळस व कंटाळा करु देत नाही. रात्रभर सलग झोप नाही मिळाली तरी सकाळी घरभर पळायला लावते. गंगेच्या काठावर राहणाऱ्यांना जसे तिचे माहात्म्य समजत नाही तसे आई जवळ असेपर्यंत तिला गृहीत धरले जाते आणि…

Read More

मराठी भाषा दिन ( भाषा टिकली, तरच संस्कृती टिकेल! )

marathi-bhasha-din

तांत्रिक आणि व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो किंवा नाही याला निश्चितच महत्त्व आहे. एखादी भाषा अभिजात असली, तरी ती लोकव्यवहारातून हद्दपार होणे शक्य असते. संस्कृत आणि लॅटिन भाषांची आज अशी अवस्था आहे. मराठी ही या प्रकारची अभिजात भाषा नाही. ती अभिजात असून, आजही लोकव्यवहारात टिकून राहिलेली भाषा आहे. खरे तर जी भाषा कालानुरूप स्वतःत योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकते, रूप पालटू शकते तीच टिकते. मराठीची अशी परिवर्तने झाली. तिने आपली रूपे पालटली. ती कर्मठांच्या आग्रहास बळी पडली नाही. सातवाहन राजवटीत संस्कृतच्या तोडीस तोड ठरलेली…

Read More