हिंदू राष्ट्राचे द्रष्टे डॉ. हेडगेवार … आणि रामदासी बाण्याप्रमाणे सर्व काही ‘परीक्षून सोडावे’ या दंडाकानुसार त्यांनी सर्व प्रचार-पद्ध-तींतून सुलभ पण परिणामकारक अशी पद्ध-ती शोधून काढली. श्रीसमर्थ रामदासांनी आपल्या ग्रंथांतून संघटनेची जी मार्मिक धोरणे सांगून ठेवली आहेत, तशाच धोरणांनी डॉ. हेडगेवार यांनी काम केले. उदाहरणार्थ ‘ओळखीने ओळखी साधावी’, ‘महंते महंत करावे, युक्तिबुद्ध-ीने भरावे’, ‘राखावी बहुतांची अंतरे’, इत्यादी वचनांतून प्रकट झालेली धोरणे नि रा.स्व. संघाच्या प्रसाराची पद्ध-ती ही बहुतांशी एकच होती असे दिसून येईल (प्रस्तुत लेख ‘केशव बळीराम हेडगेवार’, संकलन गोपाळ गोंिवद अधिकारी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे. संपा). – ग. वि.…
Read MoreAuthor: mahanagari
शुभ संकल्पाचा सण गुढी पाडवा
गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगल मुहूर्त आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खऱ्या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, बंगला खरेदी करणे, नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे, जमीन, प्लॉट खरेदी इतकेच काय, पण वाहन खरेदी, सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम व आदर्श मानला जातो. ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्वदोष काही प्रमाणात कमी होतो. शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी : ढी पाडव्याला घराची…
Read Moreकम्युनिस्ट दहशतवादाचा भयानक चेहरा !
– शरद मेस्त्री. दहशतवाद म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते जम्मू-काश्मीर; परंतु तेवढाच भयावह, त्यापेक्षाही अधिक आणि क्रूर दहशतवाद केरळमध्ये कम्युनिस्टांचा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये किमान त्यांची घटना आणि कायदे तरी वेगळे आहेत. येथे तर आपली घटना लागू असून तरतुदींचीही पायमल्ली होते. तरीही कोठेही वाच्यता नाही. केवळ आपलेच विचार आणि आचार महत्त्वाचे असून अन्य विचार ंिकवा कृती त्यांच्या साम्राज्यात आलेले त्यांना रुचत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना यमलोकी पाठविण्यात येते. या विचारांना विरोध कराल, तर मृत्यूला तयार राहा, अशीच अराजकता देशातील या सर्वोच्च सुशिक्षित राज्यात आहे. केरळ म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण.…
Read Moreआर्थिक वृद्धिसाठी पायाभूत सुविधांवर भर
२०१७-१८च्या अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या ‘यंग डेव्हलंिपग इंडिया’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतूक पायाभूत प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रस्ते, रेल्वे व नद्या या देशाच्या जीवनवाहिन्यांना प्राधान्य दिले आहे. नव्या वाहतूक सोयी निर्माण होण्यासाठी २ लाख ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. -प्रतिनिधी भारताच्या प्रगतीत जर पायाभूत सुविधा पुरेशा नसतील, तर अडचणीचे ठरू शकते. सध्याच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट´ीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्या वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य दिलेले आहे. काही काळापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व…
Read Moreनाट्यरंग – मुघले आझमचा अभूतपूर्व नाट्याविष्कार
– सतीश सिन्नरकर. हिन्दी सिनेमाच्या इतिहासात ‘मुघले आझम’ सिनेमाची निर्मिती म्हणजे एक महद् आश्चर्य मानले जाते. के. असिफ यांनी आपले सर्वस्व ओतून सतत ९ वर्षे मेहनत केली व हा अद्वितीय चित्रपट बनविला. त्या काळच्या चित्रपट निर्मितीच्या खर्चाचा विचार केला तर मुघले आझमचा खर्च किमान १०० पट जास्त झाला. या सिनेमाची कहाणी म्हणजे एक स्वप्ननगरी असून प्रत्येक बाबतीत तिचे अनोखेपण अधोरेखित होते. पहिला सिनेमा कृष्णधवल असूनही २५ आठवडे सतत चालला व त्यानंतर ४४ वर्षांनी २००४ मध्ये हा चित्रपट रंगीत केला त्यावेळीही तो २५ आठवडे चालून त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले. हा सिनेमा…
Read More…आता निषेध नको; ठोस कृती करा!
– शरद मेस्त्री मुंबईत एकेकाळी गुंडाराज माजले होते पण काही काळानंतर पोलिसांनी एकएका गुंडाना वेचून वेचून ठार मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे गुंडाराज आपोआप बंद झाले. या नक्षल्यांचे, माओवाद्यांचे व काश्मीरातील दंगेखोरांचे असेच केले पाहिजे. एकदा जबरदस्त धाक बसला की मग पुढे कुणी डोके वर काढणार नाही. येणाऱ्या काळात मोदी अशी कृती करतील का? छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पंचवीस जवानांची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राहून, त्या देशातीलच कायदे-कानून न पाळता आपल्या काही मागण्यांसाठी हाती शस्त्र घेऊन…
Read More‘गांधी – द म्युझिकल’ : प्रभावी संगीत नाटक
आपल्याकडे काही विषय असे आहेत की त्यावर प्रत्येक कलेच्या माध्यमातून सादरीकरण करता येते. महात्मा गांधी यांच्यावर आजपर्यंत पुस्तके, कविता, सिनेमा, नाटके सर्व झाली आहेत. पण या विषयावर संगीत नाटक होऊ शकते असा मात्र कधी विचार कोणाही कलाकाराच्या मनात आला नसेल. पण हे आव्हान दानेश खंबाटा या व्यक्तीने स्वीकारून त्याचे लेखन व दिग्दर्शन करीत ‘गांधी-द म्युझिकल’ हे इंग्रजी संगीत नाटक सादर केले आहे. दोन तासांच्या अवधीत संपूर्ण गांधी चरित्र संगीताच्या माध्यमातून सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. पण हे नाटक पाहिल्यानंतर त्याच्या यशस्वी प्रयोगाने मन प्रसन्न होते आणि आश्चर्यचकितही! मुंबईच्या…
Read Moreभारतीय ज्ञानाचा खजिना आमचे प्राचीन जल व्यवस्थापन
पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होता..! मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आजही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..! दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलम लावतोय, युध्द खेळतोय..!! आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं…
Read Moreकथा – संस्कार
भा. ल. महाबळ ‘‘ए टवळे, हिंिडबे, चहा आण.’’ नरेंद्र ओरडला. ‘‘आणते, आलेच.’’ नेहानं विसरतेपणी सरळ उत्तर दिलं. ‘‘नेहा, तुला वरणभातातील, मनूवादी भाषेत बोलायचं असेल तर मला तुझा चहा नको, तो मोरीत ओतून दे. असं पिचपिचीत बोलत राहिलीस तर खिडक्यांच्या काचांवर हजारो रुपये, पुढील वर्षांत खर्चावे लागतील. पैशाचं एक सोड, पण आपल्या भावी बाळाचा विचार कर. तोही स्वच्छ, सरळ, मनूवादी भाषा बोलेल. त्याचा या जगात काय निभाव लागेल?’’ ‘‘सॉरी, मी विसरले. ए मुडद्या, चहा प्यायचा असेल तर घे, नाहीतर उलथ. उकिरडा फुंक्या मेला!’’ नेहानं चहाचा कप टेबलावर मुद्दाम हलवला. ‘‘अगं उंडगे,…
Read Moreपरशुराम जयंती विशेष
परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार – कमलाकर तांबे परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. आईवडील – परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला. कार्य – अधम अशा क्षत्रियांचा वध : ‘वाल्मीकीने त्याला ‘क्षत्रविमर्दन’ न म्हणता ‘राजविमर्दन’ म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’ कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व…
Read More