मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे? हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ. मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले. मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची…
Read MoreCategory: आरोग्य
हेल्थ लाईव्ह@ सिनियर्स टुडे
सिनियर्स टुडे ने १ ऑक्टोबरला डॉ कल्पना सारंगी (प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ, नानावटी रुग्णालयात डर्मेटॉलॉजी विभागाच्या प्रमुख) यांच्या उपस्थितीत साप्ताहिक लाईव्ह वेबिनारचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांनी जेष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या या विषयावरील प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच जेष्ठ नागरिकांनी आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ कल्पना सारंगी यांनी त्वचा या विषयात एम डी ची पदवी मिळवली आहे. त्या आघाडीच्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. तसेच नानावटी रुग्णालय येथे कॉस्मेटोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्या भारतातील काही मोजक्याच कॉस्मेटो डर्मेटोलॉजिस्ट पैकी एक आहेत. १००…
Read Moreतुळशीचे वैज्ञानिक महत्व
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवादफक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यु सोडते व या वायुच्या संपर्कातमनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार,…
Read Moreरोगांवर घरगुती उपचार
– वैद्य निर्मला ग. जोशी माजी रीडर व प्रमुख, प्रसूती तंत्र विभाग, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी आयुर्वेदिक कन्सेप्ट्स इन गायनॉकॉलॉजी या पुस्तकाच्या लेखिका ‘गृहिनी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. पोषण, शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. वैद्यकीय प्रतिष्ठा यांच्या स्पर्धेतच बहुशः गुंतली आहे. तेव्हा गृहिणीनंच थोड्या धिटाईनं आजीबाईचा बटवा हातात घेतला पाहिजे. बटवा आजीबाईचा असला तरी ती…
Read Moreरहस्य भारतीय सौंदर्याचे
– गीताजंली ताम्हाणे भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही साऱ्या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत. कारण या सौंदर्य प्रसाधनांना पैसा फार लागत नाही. ती घरीच तयार केली जातात आणि त्यातल्या एखाद्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर चुकला तरीही त्याची कसलीही रिऍक्शन येत नाही. ीभारतीय सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारी सामुग्री आपल्या दारात असते, आजीबाईच्या बटव्यात असते नाहीतर आपल्या स्वयंपाकघरातल्या तिखटामिठाच्या डब्यात तरी असते. यातली कोणतीही वस्तू आपल्या शरीराशी विसंगत नाही. एवढी सोपी ही सौंदर्य प्रसाधने केवळ सौंदर्यच वाढवतात असे नाही तर ती आपल्या आरोग्यालाही हितकारक असतात. औषधी म्हणनही…
Read Moreमहत्त्वाच्या औषधी वनस्पती
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत. – वैद्य सुशांत काळे १. कडूनिंब हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक…
Read Moreअनुभवाचे बोल
– डॉ. भा. वा. आठवले देवगड, सिंधुदुर्ग, ९४२२४३५३३८ जुने कागदपत्र सहज चाळतांना, माझे वडील बापू ऊर्फ कै. वामन धोंडदेव आठवले यांनी स्वानुभवावर लिहिलेली टिपणे सापडली. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्याच्या जोडीला वैद्यक व्यवसाय करीत, पण तसा तो आतबट्ट्याचा होता. पैसा मिळविणे हा त्यांचा हेतूच नसल्यामुळे रोग्याला बरे वाटणे हाच आपला मुख्य मोबदला अशा भावनेनें ते उपचार करीत. खूप दूरच्या ठिकाणाहून लोक श्रद्ध-ेने त्यांच्याकडे येत असत. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे त्यांचे एकूण आचरण होतें. इ.स. १९५६ साली मी देवगड, जि.ंिसधुदुर्ग येथे व्यवसायाला सुरुवात केली. त्या काळात या परिसरांत…
Read Moreकोकणातील आयुर्वेदीय वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग
निसर्गसौंदर्याने नटलेल्या, नानाविध वनस्पतींनी, फळा-फुलांनी बहरलेल्या कोकणात आयुर्वेदीय वनस्पतींचे भांडारच आहे. पूर्वांपार येथील लोक या वनस्पतींचा विविध आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करत आलेले आहेत. अशा कोकणात आढळणाऱ्या काही वनस्पती वेली यांचे आयुर्वेदिक महत्त्व विशद करणारा लेख – – आयुर्वेद महोपाध्याय दाजीशंकर पदेशास्त्री अंबाडी ही कोकणसह भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑईल’ असे म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त…
Read Moreआला उन्हाळा, तब्बेत सांभाळा!
टरबूज – उन्हाळ्यात सर्वांत उपयोगी फळ म्हणजे टरबूज. यात भरपूर पाणी असते. शिवाय कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते. सफरचंद – सफरचंदात सर्वांत जास्त फायबर असतात. या व्यतिरिक्त सफरचंदाच्या सालात एंटीऑक्सीडेंट घटक असतो. लोहही असते. यामुळे हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे. खरबूज – खरबूजसुद्धा खास उन्हाळ्यातील फळ आहे, यामुळे शरीराला गरजेइतके पाणी मिळते. यात व्हिटॅमिन ए, सी, लोह, सोडियम आणि पोटेशियम असते. *सकाळी-सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी नक्की वेळ काढा. *घरातून बाहेर निघताना सनक्रीन लोशन लावा. स्कार्फ, समर कोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या. *डोळ्यांना सूर्याच्या तेज…
Read Moreऔषधी दुधी भोपळा
दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहे. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व ‘क’ असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे. * हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. * दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात. * रोज…
Read More