आव्हानांना थेट भिडणारे नेतृत्व

ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरांवर आणि विविध पक्षांमध्ये जी मंडळी जनतेचे नेतृत्व करीत आहेत, त्यांच्या यादीवर नजर टाकली तर समाजाचे व देशाचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, धमक आणि कौशल्य यापैकी किती जणांमध्ये असेल याची दाट शंका यावी असे देशाच्या राजकारणाचे विषण्ण करणारे आजचे वास्तव आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेचे इतके अवमूल्यन गेल्या ५०-६० वर्षांत झाले आहे की, दमदार नेतृत्व निर्माण करण्याची शक्ती एकाही राजकीय पक्षामध्ये दिसत नाही; आणि म्हणूनच नरेन्द्र मोदींसारखा एखादा अपवादात्मक दिसणारा आशेचा किरण लोकांना आश्वासक वाटतो. वास्तविक इतक्या वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेतून प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक राज्यात दमदार, विचारशील, आचारशील तरुण नेतृत्वाची…

Read More

मुंबईची विकास वाहिनी

मुंबई महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, विकास गंगोत्री, शिक्षण, उद्योग, सेवाक्षेत्र ह्या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रणी असणारी मुंबई. मुंबईच्या चाकरमान्यांना इप्सित स्थाना पर्यंत पोहचवणारी मुंबई लोकल. मुंबईची लोकल ही मुंबई ची जीवन वाहिनी आहे. विकास वाहिनी आहे. कारण रोज नोकरीधंद्या निमित्ताने लोक प्रवास करतात आणि लोकल ट्रेन हा वहातुकीचा सोपा, कमी खर्चिक व वेळ वाचवणारा पर्याय आहे. लाॅकडाऊनचे निमित्त देऊन सर्व सामान्य माणसाकरता ह्या प्रवासावर जी बंदी आणली आहे ती आज सर्वस्वी चूक आहे. नोकरी किंवा चरितार्थाकरिता नाइलाजाने बाहेर पडणारा माणूस लाॅकडाऊनला कुरवाळून बसू शकत नाही. लोकलबंदीचा निर्णय त्याच्या बोकांडी मारल्या…

Read More

कोकणच्या समृद्धीचे स्वप्न

nature-s-wonder-in-kokan

सतीश सिन्नरकर, संपादक सह्याद्रीच्या कडे-कपारीत पहुडलेला…अरबी समुद्राचा नितळ…निळेशार किनारा लाभलेला…माडा-पोफळींच्या, गर्द आमराईच्या बागांचा हिरवा साज ल्यालेला…आंबा, काजू, फणस यासारख्या विविध फळांच्या रानमेव्याचा…रानफुलांच्या रानगंधाचा…ओल्या-सुक्या मासळींचा…विविध बोलींचा, लोककलांचा…परंपरागत जपलेल्या संस्कृतींचा…आपलेपणाच्या ओढीचा…शहाळ्यातील पाण्याच्या गोडीचा…ज्या भूमीने अनेक नररत्ने दिली अशा शूरवीरांचा…गड आणि किल्ले यांतून इतिहासाची साक्ष देणारा… लालमातीचा टिळा लावून पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणारा…कोकणी बाण्याचा…निसर्गाच्या अनुपम लावण्याने मोहवणारा…असा हा कोकणाचा परिसर म्हणजे जणू सृष्टिसौंदर्याचं कोंदणच! खरच…हे नयनरम्य कोकण…भविष्यात नक्की कसं असेल?…काय आणि कसा असेल कोकणचा चेहरा-मोहरा? धावत्या युगात काळाची गणितं दिवसागणिक बदलत जातात. जगण्याची समीकरणं बदलतात…वेगवेगळे प्रवाह येतात…या सा-या प्रवासात माझं कोकण कोणतं रुप…

Read More

कोकणचा विकास व्हायचा असेल तर मानसिकता बदलायला हवी!

develop-Konkan

कोकणातली जी काही डेव्हलपमेंट झाली आहे ना ती तेथील लोकांनी आपली स्वत:ची गरज म्हणून केलेली आहे. यात शासनाने काहीही केलेले नाही. शासनाने दाखवावेत कोकणात त्यांनी किती उद्योजक, व्यावसायिक निर्माण केलेले ते… आम्ही समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. कोकणात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. छोट्या छोट्या…. पण सरकारला तसे करायचेच नाही. त्यांना डायरेक्ट अशी सिवर्ल्ड, मरिनपार्क सारखीच मोठीमोठी स्वप्ने पडतात व अर्धवट राहतात, लोकांचा विरोध होतो. – कृष्णा केसरकर आपले बालपण व शिक्षण याविषयी सांगा? मी कृष्णा गजानन केसरकर, मु.पो. माणगाव, सिंधुदुर्ग. माझे आईवडील तेथेच राहतात. माझे शिक्षण माणगावातच झाले. आई…

Read More

दळणवळण क्रांतीच्या उंबरठ्यावर

transportation-of-kokan

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सात नोव्हेंबर रोजी कोलाड येथे कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत असतानाच विद्युतीकरणाचे कामही लवकरच सुरू होत आहे. त्याच बरोबर कोकण रेल्वेचे अन्य प्रकल्पही मार्गी लागत आहेत.कोकणातील दिघी आणि जयगड बंदरं कोकण रेल्वेशी जोडण्याच्या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. अलिबागला आरसीएफच्या रेल्वे मार्गाने मुंबईला जोडण्याची कल्पनाही प्रत्यक्षात येऊ घातली आहे.उरण रेल्वेचं अनेक वर्षे रखडलेले काम सुरू होत असून रत्नागिरी किंवा राजापूर पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रकल्पावर रेल्वे गंभीरपणे विचार करीत आहे. थोडक्यात कोकणात रेल्वेचं जाळं विणण्याचं प्रभू यांनी नक्की केलेलं…

Read More

मराठी भाषेची उपेक्षा

neglect-of-marathi-language

मराठी भाषेचा हा मागासलेपणा मात्र मुंबई महानगर पालिकेतील गुजराती, कन्नड, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना फारच लवकर पडला. त्यामुळे मराठी भाषेला फालतू ठरवून दुसरी भाषा म्हणून या शाळांनी हिंदीसारख्या प्रगत भाषेचा अंगिकार केला व मराठीला हुसकून लावले. मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळाही हिंदीला पसंत करतात. असा हा महाराष्ट्रातल्या अन्य भाषांचा, भाषिकांचा महिमा आहे. अन्य प्रांतात त्या – त्या भाषांचा, मातृभाषांचा व इंग्रजीचाच अभ्यास होतो. उत्तर भारतात हिंदी – इंग्रजी व दक्षिण भारतात मातृभाषा आणि इंग्रजी अशी पसंती असते. महाराष्ट्रात इंग्रजी, हिंदी थोडीफार जागा मिळालीच तर मराठीला. – सुरेश सावंत भाजप नेते, पनवेल…

Read More

मराठी आणि नवीन इंग्रज

marathi-and-new-english

– शरद मेस्त्री राष्ट्रीय एकात्मता ही केवळ महाराष्ट्रनेच राबवायची गोष्ट नाही. आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय एकात्मता एक भोंगळ गोष्ट आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने सतत लक्षात ठेवले पाहिजे. या देशातील सर्व स्तरावरील सत्ताधीश हे स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यातच गर्क आहेत; तेवढे ते मतलबी आहेत. त्यांना फक्त नेतृत्व टिकावयाचे आहे. एखाद्या तत्त्वाचा अंगीकार करणारी ही मंडळी नाहीत. वारा फिरेल तशी पाठ फिरवून मतलब साधणारी ही मंडळी आहेत. आणखी दहा वर्षांनी दुर्दैवाने खेळ पाहण्यापेक्षा आजच मराठी भाषेच्या अध्यापनाचा, माध्यमाचा आग्रह धरला पाहिजे. मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती…

Read More

समर्थांचे शब्दसामर्थ्य

samartha-s-words

– डॉ. साधना सुधाकर गोखले समर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती जी सदासर्वदा जागृत असे. मनोबोध, अभंगगाथा, करुणाष्टके, असंख्य पदे, सवाया, डफगाणी, पोवाडे, आरत्या, आख्यान काव्ये, आत्माराम, दासबोध असे समर्थांचे अफाट साहित्य असले तरी ‘आत्माराम’ दासबोध ‘माझे रूप स्वत: सिद्ध-’ असे त्यांनी स्वत:च म्हटले असल्याने प्रामुख्याने दासबोध ही त्यांची ‘वाङ्मयीन मूर्ती’ आहे. दासबोधात एकूण वीस दशके आहेत. प्रत्येक दशकाचे दहा समास असे वीस दशकांचे दोनशे समास आहेत. यातील ओवीसंख्या ७७५१ इतकी आहे. समर्थांनी जे जे अनुभविले ते ते सारे यातून व्यक्त झाले आहे. त्यांचे प्रतिपादन सरळ आणि मराठी रोखठोक आहे. विषय…

Read More

मराठी भाषा दिन ( भाषा टिकली, तरच संस्कृती टिकेल! )

marathi-bhasha-din

तांत्रिक आणि व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो किंवा नाही याला निश्चितच महत्त्व आहे. एखादी भाषा अभिजात असली, तरी ती लोकव्यवहारातून हद्दपार होणे शक्य असते. संस्कृत आणि लॅटिन भाषांची आज अशी अवस्था आहे. मराठी ही या प्रकारची अभिजात भाषा नाही. ती अभिजात असून, आजही लोकव्यवहारात टिकून राहिलेली भाषा आहे. खरे तर जी भाषा कालानुरूप स्वतःत योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकते, रूप पालटू शकते तीच टिकते. मराठीची अशी परिवर्तने झाली. तिने आपली रूपे पालटली. ती कर्मठांच्या आग्रहास बळी पडली नाही. सातवाहन राजवटीत संस्कृतच्या तोडीस तोड ठरलेली…

Read More