आव्हानांना थेट भिडणारे नेतृत्व

ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरांवर आणि विविध पक्षांमध्ये जी मंडळी जनतेचे नेतृत्व करीत आहेत, त्यांच्या यादीवर नजर टाकली तर समाजाचे व देशाचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, धमक आणि कौशल्य यापैकी किती जणांमध्ये असेल याची दाट शंका यावी असे देशाच्या राजकारणाचे विषण्ण करणारे आजचे वास्तव आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेचे इतके अवमूल्यन गेल्या ५०-६० वर्षांत झाले आहे की, दमदार नेतृत्व निर्माण करण्याची शक्ती एकाही राजकीय पक्षामध्ये दिसत नाही; आणि म्हणूनच नरेन्द्र मोदींसारखा एखादा अपवादात्मक दिसणारा आशेचा किरण लोकांना आश्वासक वाटतो. वास्तविक इतक्या वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेतून प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक राज्यात दमदार, विचारशील, आचारशील तरुण नेतृत्वाची…

Read More

“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’

“राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने ‘अथर्व फाऊंडेशन’ तर्फे आपले संपूर्ण आयुष्य मानव सेवेसाठी समर्पित करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बोरिवलीचे आमदार श्री. सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विट्टी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोरोना महामारीच्या या कठीण काळात डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावले आहे. या दरम्यान अनेक डॉक्टरांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा डॉक्टरांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच “राष्ट्रीय डॉक्टर दिना” च्या निमित्ताने…

Read More

मुंबईची विकास वाहिनी

मुंबई महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, विकास गंगोत्री, शिक्षण, उद्योग, सेवाक्षेत्र ह्या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रणी असणारी मुंबई. मुंबईच्या चाकरमान्यांना इप्सित स्थाना पर्यंत पोहचवणारी मुंबई लोकल. मुंबईची लोकल ही मुंबई ची जीवन वाहिनी आहे. विकास वाहिनी आहे. कारण रोज नोकरीधंद्या निमित्ताने लोक प्रवास करतात आणि लोकल ट्रेन हा वहातुकीचा सोपा, कमी खर्चिक व वेळ वाचवणारा पर्याय आहे. लाॅकडाऊनचे निमित्त देऊन सर्व सामान्य माणसाकरता ह्या प्रवासावर जी बंदी आणली आहे ती आज सर्वस्वी चूक आहे. नोकरी किंवा चरितार्थाकरिता नाइलाजाने बाहेर पडणारा माणूस लाॅकडाऊनला कुरवाळून बसू शकत नाही. लोकलबंदीचा निर्णय त्याच्या बोकांडी मारल्या…

Read More

The Biggest Mistake Of The Bhima Koregaon Accused?

The inability to embrace electoral politics and preference to remain within the bounds of a “civil society movement”, the stupid attempt to create “a third voice that would seek justice in the courts of India” will go down history as their single worst error. By shying away from political involvement, by not registering a political platform, by not trying to dominate politics, they demonstrated their collective inability to confront inequity and to turn their agenda into a struggle for the people, by the people. This in essence was the biggest…

Read More

कलीयुगातील राम सीता

आज नाशिकरोड येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या गरीब केविलवाण्या दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाच विचारलं तर ते नको म्हणाली मग मी त्यांना १००/- रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले ,मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय मग सुरू झाला त्यांचा जीवनपट ,- ते २२०० किमी चा प्रवास करून आता द्वारका ला स्वतःच्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे १ वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही…

Read More

कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवावी ?

दुसरी लाट तीन महिन्यांपूर्वी येऊन धडकली आणि सर्वजणांना धक्का बसला, खरं तर दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेचे भाकित होते पण पहिली लाट ओसरल्यावर सर्वत्र एक प्रकारचा मोकळेपणा दिसू लागला,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले आणि दुसरी लाट भयावह पध्दतीने येऊन आदळली हे सर्वांनी अनुभवलं आहे. ह्यावेळी दुसरी लाट आटोक्यात यायच्या आधीच तिसऱ्या लाटेची ती लहान मुलांना धोकादायक ठरू शकेल असे म्हटलं जात आहे, ज्यामुळे जनतेत चिंता पसरताना दिसते आहे. आता दुसरी लाट ओसरल्यावर सर्वच माध्यमांतून तिसऱ्या लाटेची चर्चा चालू झाली असून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची ह्यावर चर्चा होत आहेत. वस्तुतः कोरोना लॉकडाऊन…

Read More

कोविडने बदलली जीवनशैली

आता कोविड 19 ची दूसरी लाट ओसरली आणि निर्बंध कमी झाले म्हणून लोकांनी निःश्वास टाकला आहे पण ह्या कोरोनामुळे एकूणच जीवनाची वीण उसवल्यासारखी झाल्याचे सतत जाणवते. दीड वर्षांपूर्वी जेव्हां कोरोनाची चर्चा सुरू झाली तेव्हां कोरोनाचे अक्राळविक्राळ रूप भारतीयांना कळले नव्हते पण मार्च २० मध्ये कोरोना भारतात आला आणि राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सर्वांना त्याची दाहकता जाणवू लागली. लॉकडाऊनचा प्रभाव दैनंदिन जीवनावर पडलाच पण स्थलांतरित मजूर व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची दैना उडाली. वाहतूकीची साधने बंदच झाल्याने स्थलांतरित मजूर कुटुंबकबिल्यासह आपल्या गावाकडे पायीच चालू लागले तर अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्यांंना १५…

Read More

आरक्षण धोरण ः आढावा घेणे आवश्यक

मराठा समाजास आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि पुन्हा एकदा आरक्षणाची चर्चा जोरात सुरू  झाली. नोकरी मिळण्यात जे आरक्षण आहे ते योग्य असले तरी बढती मिळण्यात आरक्षण असावे की नसावे हाही एक वादाचा मुद्दा आहे. या विषयावरही सध्या खडाजंगी चालू आहे.  मा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद करून शेकडो वर्षांच्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याआरक्षणाची मुदतही त्यांनी निश्चित केली होती. पण नंतर वेळोवेळी ती मुदत वाढविण्यात आली. आज महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण ५२ टक्के आरक्षण आहे. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा…

Read More

विश्वगुरू भारत

गुरू-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून याच परंपरेमुळे मानवी प्रतिभेचा परमोत्कर्ष झाला. आपल्या पूर्वजांनी जीवन समृद्ध- करणारी चिरंतन सूत्रे प्रस्थापित केली. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानात गुरूचे स्थान सर्वोपरि असून प्रत्यक्ष परमेश्वराहून श्रेष्ठ मानले जाते. काय आहे ही संकल्पना? गुरू हे असे तेज आहे की ते प्रगट होताच सारे संशय, सारा अंधार समाप्त होतो. गुरू वचनांचे अमृत प्राशन केल्यावर सर्व प्रकारची क्षुधा शांत होते. गुरू हा असा एक मृदंग आहे की ज्याचा स्वर उमटताच अनाहत ध्वनी ऐकू येतो. बासरी वाजू लागताच जसे मन तल्लीन होते, तसा निर्भेळ आनंद देणारे गुरूचे…

Read More

तुळशीचे वैज्ञानिक महत्व

तुळशीचे वैज्ञानिक महत्व

  जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवादफक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यु सोडते व या वायुच्या संपर्कातमनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार,…

Read More