शिवसेनेचे आमदार श्री संजय राऊत हे शिवसेनेने बाबरी मशीद फक्त १७ मिनिटात पाडली असे सांगून कपटीपणा करतायत. अगदी तसाच ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी स्व बाळासाहेब ठाकऱ्यांनी (ते हयात) असताना मशीद पाडल्याचं श्रेय स्वतःकडे घेऊन केला होता. – सुजाता आनंद. हे मी माझ्या सम्राट नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. शिवसेनेमुळे मुंबई कशी बदलली? पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांच्यासाठी परत सांगते. तरुणपणी मी नॅशनल वायर या वृत्तपत्रासाठी काम करत होते. रविवारचा ओव्हर टाईम लागला होता. ६ डिसेंबर १९९२ ला आमच्या संपादकांनी मला सांगितलं अयोध्येतून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेव. दंगली होतील असा त्यांचा…
Read MoreCategory: India
माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे.
माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे. कलेला कोणताही धर्म नसतो. एक कलाकार हा कलाकारच असतो. कोणतीही कला लोकांसमोर अशी सादर करावी की लोकांनी निःशब्द व्हायला हवं. १९५० च्या उत्तरार्धात ११ वर्षांच्या हैदर अली यांनी कथकली संगीत शिकण्यासाठी केरळ येथील कला मंडलम मध्ये प्रवेश घेतला. कथकली ही कला मंदिरात सादर केली जाते. हैदर अलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने नृत्यासाठी शिकवणी लावणे हे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. असे म्हणतात की एका हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबाने त्यांच्या शिकवणीचे पैसे भरले होते. श्री हैदर अली हे मुस्लिम असल्याने मंदिरात आपली कला…
Read Moreशाह फैझल यांची IAS ऑफिसर म्हणून पुन्हा नियुक्ती
नवी दिल्ली- सरकारने IAS ऑफिसर फैझल शाह यांचा राजीनामा मान्य करून त्यांना त्यांची नोकरी परत दिली आहे.त्यांचे पुढचे पोस्टिंग लवकरच जाहीर करण्यात येईल. फैझल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण केली. त्यांनी केलेल्या टि्वट्स मध्ये म्हटले आहे की २०१९ मध्ये त्यांनी नोकरी सोडून राजकारणात जायचे ठरवले. ‘माझ्या आयुष्यातले ८ महिने (जानेवारी १९ ते ऑगस्ट १९) हे खूप तणावपूर्ण होते. एका केसवर काम करत असताना मी इतक्या वर्षात जे कमावले ते सर्व मला गमवावे लागले. नोकरी, मित्र, माझं नाव सगळं गमावलं. पण मी आशा कधीच सोडली नाही. माझीच…
Read Moreराजकारणामध्ये गुन्हेगारांचा आणि श्रीमंत व्यक्तींचा वाढता प्रवेश
आकृती १ निवडणूक जिंकलेले पक्ष, मतदानाची टक्केवारी, जिंकलेल्या उमेदवाराचे नाव, त्याची मालमत्ता आणि मतदारसंघ. उत्तर प्रदेशात ४०३ उमेदवारांपैकी ५१% उमेदवारांवर गुन्हे दाखल होते.३९% उमेदवारांवर हत्या, दंगली,महिलांची छेडछाड असे गंभीर गुन्हे होते. २०१७ च्या निवडणुकांच्या तुलनेत दोन्हीमध्ये १५% आणि १३%ने वाढ झाली आहे. योगी आदित्य यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. आकृती १ मध्ये बहुतेक ठिकाणी भगवा रंग दिसतो. २१० अब्ज विविध मतदार असलेल्या राज्यात भाजप आणि समाजवादी पार्टी हे दोनच मुख्य पक्ष होते. ४०३ मतदार संघांपैकी २५५ मतदार संघात भाजप चे उमेदवार निवडून आले. तर १११ मतदार संघात…
Read Moreसौंदर्य प्रसाधने तसेच लॉजिस्टिक्स आणि IT (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रात वाढू लागल्या रोजगाराच्या संधी.
नवीन वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यातच रोजगार निर्मिती जोरात सुरु झाली असून कोविड पूर्वीच्या काळात १३.७% असलेले मुलाखतीचे प्रमाण या ३ महिन्यात ३० मिलियन पर्यंत गेले आहे. (माहिती Apana.com रोजगारासंबंधीची वेबसाईट). या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४२% रोजगार निर्मिती झाली आहे. मागच्या वर्षातील कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर इतर क्षेत्रांपेक्षा आरोग्य सेवा, इ-कॉमर्स, या क्षेत्रांना सुगीचे दिवस आले आहेत. २०२२च्या पहिल्या तिमाहीत सौंदर्य प्रसाधने, हॉटेल्स या क्षेत्रातही रोजगार निर्मिती होत आहे. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात ८०% तर हॉटेल्स आणि पर्यटन क्षेत्रात ३०% ने रोजगार निर्मिती होत आहे. तर IT (माहिती तंत्रज्ञान) आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी हा…
Read Moreनौदलातील उठावामुळे भारताला लवकर स्वातंत्र्य मिळाले.
भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना जेवढा आदर मिळायला हवा तेवढाच आदर भारतीय नौदलाच्या सैनिकांना मिळायला हवा. १८ फेब्रुवारी १९४६ हा दिवस २६ जानेवारी इतकाच महत्वाचा आहे. कारण त्या दिवशी सगळंच बदललं. भारतीय नौदलात भरती झालेले सगळेच त्यावेळी तरुण होते. जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीतच दुसरे महायुद्ध संपवून सेना परतली तेव्हा ब्रिटिशांच्या कचाट्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने बोस बाबूंच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याची हकीकत तेव्हा कर्णोपकर्णी झाली होती. साहजिकच जे तरुण नौदलात नुकतेच भरती झाले होते त्यांना यामुळे प्रेरणा मिळाली. त्यांना नौदलात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि जो भेदभाव त्यांच्यात केला जात होता त्याबद्दल त्यांच्या…
Read Moreआर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कमर्शिअल बँकांनी २.०२ लाख कोटींचे बुडीत कर्ज माफ केले आहे.
भारतातल्या सर्व शेड्युल कमर्शिअल बँकांनी रुपये २,०२,७८१ करोडचे कर्ज माफ केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका यात आघाडीवर आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १,३१,८९४ एवढ्या रकमेची कर्ज माफ केली आहेत, अशी माहिती राज्यसभेत दिली गेली. भारताचे अर्थमंत्री (राज्य) डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. ते पुढे असेही म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे असे कर्जदार जे कर्जाची रक्कम फेडूच शकत नाहीत आणि जर त्यांची नावे ४ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये असतील तर ती ताबडतोब काढून टाकण्यात यावी. कर्ज माफी ही बँकांसाठी काही नवीन गोष्ट नाही.…
Read Moreन्यायमूर्तींच्या खाजगी परदेश दौऱ्याला मंजुरी देण्यासाठी MEA ने दाखल दाखल केलेला विनंती अर्ज खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला.
कोर्टातले न्यायमूर्ती जर खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जाणार असतील तर त्याला मंजुरी घेण्यात यावी असा परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती श्री राजीव शकधर आणि श्री जस्मित सिंग यांनी १३ जुलै २०२१ रोजी MEA च्या या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली. त्या नुसार कोर्टातील न्यायमूर्तींना खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जायचे असल्यास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल असे त्यात म्हटले होते. श्री अमन वचर ज्यांनी ही याचिका दाखल केली. त्यांच्या मते असा आदेश देणे म्हणजे न्यायाधीशांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीश ज्या पदावर…
Read Moreचारधाम म्हटलं की डोळ्यासमोर तीर्थ यात्रा येते. सर्च टीमने ने ३ हरवलेले चारधाम तीर्थयात्रेसाठी जाण्याचे मार्ग पुन्हा शोधले आहेत.
चारधाम ट्रेकला जाण्याचे मार्ग शोधायला गेलेल्या सर्च टीमला ३ हरवलेले मार्ग सापडले आहेत. आणि तेच थोडीफार दुरुस्ती करून पुन्हा सुरु करता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. जर हे ट्रेकचे मार्ग पुन्हा सुरु केले तर तीर्थ यात्रेला अधिक यात्रेकरू जाऊ शकतील आणि त्यामुळे उत्तराखंडमधील पर्यटनास चालना मिळेल. असे टीम लिडर राकेश पंत यांनी मोहीम संपल्यावर पीटीआयला सांगितले. पंत आणि टीममधील इतर सदस्य सुमारे ५० दिवसात अत्यंत कठीण असा ११५८ किमीचा प्रवास करून जिथे हवामान चांगले असेलच असे नाही. अशा प्रदेशातून सोमवारी ऋषिकेशला परत आले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास त्यांनी…
Read More