स्टार्ट अप पासून सुरुवात केलेल्या ६०,००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि एकीकडे भारत २०० युनिकॉर्न कंपन्या सुरु करण्याच्या तयारीत आहे. अपुऱ्या पैश्यांअभावी बरेचसे स्टार्टअप्स बंद पडले असून ६०,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या सगळ्यात इ कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील तरुणांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण जास्त आहे. २५ शहरातून १२२ स्टार्टअप्स युनिकॉर्नस बनण्यासाठी तयार आहेत.(ज्यांचे भांडवल १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त असते) पण खरी गोष्ट ही आहे की अनुदानाअभावी स्टार्टअप्स बंद पडत असून तिकडे काम करणारे तरुण बेरोजगार होत आहेत. १२ हजार स्टार्टअप्सने तरुणांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यात ओला,…
Read MoreCategory: Must Read
शेलीच्या दुधाचे चीजः गुजरातमधील भटक्या समाजाचा पारंपारिक व्यवसाय!
पशुपालन करणाऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने कोणतीही प्रक्रिया न करता बनवलेल्या चीज/ पनीरची मागणी सध्या ग्राहकांमध्ये वाढत आहे. यातून हे समोर आलं की भारतीयांना ४५०० वर्षांपूर्वीपासून चीज बनवण्याची कला अवगत आहे. पण कालौघात ती मागे पडली. आज आपण एका सेवाभावी संस्थेचे आणि चेन्नईतील उद्योजकाचे आभार मानायला हवेत. कारण त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेळीपालन हा व्यवसाय शेळीचे दूध काढण्यापर्यंत मर्यादित न राहता(शेळीचे मांस विकायला बंदी आहे) त्याला आता चीज/ पनीर बनवण्याच्या व्यवसायाची जोड मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे जुनी परंपरा मूळ धरू लागली आहे. भारतातील शेळीपालन करणाऱ्यांना पूर्वी पासून माहित होती डोंगरातून प्रवास करताना हे लोक…
Read Moreएकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी बाबत कार्यकर्ते साशंक आहेत.
कैंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली आणि ती कठोर पणे पाळली जाईल असेही सांगितले. त्यासाठी जागोजागी नियंत्रण कक्ष लावले जातील. आणि या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष कृतीदल स्थापन केले जाईल, असे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक राज्यात तपासणी केली जाईल. ही बंदी संपूर्ण भारतात लागू असेल. एवढे सांगून सुद्धा प्लास्टिक बंदीबाबत कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये प्लॅस्टिकच्या काड्या, इयर बड्स, फुगे, कप, प्लास्टिकचे ग्लास, काटे चमचे, सुऱ्या, १०० मायक्रोन पेक्षा कमी पीविसी बॅनर्स, सजावटी साठी लागणारे पॉलीस्टरीन, निमंत्रण पत्रिका या सर्व गोष्टींचा समावेश होतो. ज्यावर पर्यावरण मंत्रालयाने १ जुलै पासून बंदी घालण्याचा निर्णय…
Read Moreबँक ऑफ महाराष्ट्र ः बुडीत कर्जे ११२०० कोटी!
बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०१४ पासूनचे ४२ बुडीत खाते धारकांचे ११,२०४.१० कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण खातेधारकांची नावे विचारली असता त्यावर मौन पाळले. तसेच आर्थिक वर्ष १३-१४ या वर्षातील बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली २५४८.१३ कोटींची रक्कम माफ केली आहे. गेल्या ९ वर्षात मोठे खातेधारक आणि लहान खातेधारकांकडून बँकेला फक्त १५% पेक्षा कमी रक्कम वसूल करता आली आहे. मोठे खातेधारक ज्यांनी १०० करोड पेक्षा जास्त पैसे थकवलेले आहेत आणि लहान खातेधारक ज्यांच्याकडून १० करोड किंवा त्यापेक्षा कमी येणी बाकी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे भाग धारक श्री.…
Read Moreबांगलादेश कडून कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेतली जाते
कोणत्याही बाबतीत व्यक्तीने सुवर्णमध्य काढायला शिकले पाहिजे. टोकाची भूमिका घेणे केव्हाही घातक ठरू शकते. जे व्यक्तीच्या बाबतीत तेच राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे. १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशमधील अतिरेकी लोकांनी आर्टिसन बेकरी येथे हल्ला केला होता. ज्यात मुख्यत्वे परदेशी नागरिक आणि मुस्लिमेतर नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. बांगलादेशने याचे उत्तर अतिरेकी हल्ल्यातून दिले. २०१६ पासून अतिरेकी हल्ले कमी झाले असले तरी इस्लामिक गटांच्या हालचाली सुरु आहेत. तरुण कोवळ्या वयाच्या मुलांना शोधून त्यांच्या डोक्यात जिहाद बद्दल संकल्पना भरवून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या करवी छोटे हल्ले करवून दहशत पसरवणे आणि स्वतः…
Read Moreविद्यापीठांच्या कुलगुरू पदी राज्यपालांची नेमणूक.
उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले आहेत. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार तत्परतेने काम करणारे अशा शब्दात त्यांचे ‘कौतुक’ केले आहे. काही राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. पण विधानसभेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विद्यापीठांना असलेल्या राजकीय पाठिंब्याबद्दल नेहमीच विद्यापीठांनी ठोस भूमिका घेतली आहे. श्री जयप्रकाश नारायण यांच्या काळापासून ते अगदी जवाहरलाल नेहरू विद्यापीठापर्यंत. या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक झाली आहे. न्यायमूर्ती V R कृष्णा अय्यर यांनी राज्यपालांच्या कार्यालयांना नामधारी कार्यालये म्हटले आहे. म्हणजे ते तेवढेच काम करतात जेवढे मंत्रिमंडळातून त्यांना करण्यास सांगितले जाते. मरू राम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया…
Read Moreडॉ. वॉल्टर विरिया यांचे डोळ्यात अंजन घालणारे अनुभव
माणसाने भूतकाळात झालेल्या चुकांपासुन काहीतरी शिकायला हवे, असं म्हणतात. पण शिकेल तो माणूस कसला? त्यामुळे तो नेहमीच तोंडावर पडत असतो. आणि चुका सुधारायच्या सोडून आणखी चुका करत जातो. पण काही गुण माणसामध्ये आवश्यक असतात. जसे की माणसाच्या अंगी समजूतदारपणा असावा. तुमचं काम पाहून कंपनीला विश्वास वाटायला हवा की याला एकदा काम दिले की तो ते काम अचूक करू शकेल. असे गुण असलेली माणसं कंपनीला/मॅनेजरला हवी असतात. आपल्या कामाशी नेहमीच प्रामाणिक राहणे शक्य आहे का? की बदमाशी करण्यासाठी सुद्धा वाव आहे. हे विचार माझ्या मनात आले जेव्हा मी वर्तमानपत्रातील एक लेख…
Read Moreखासी हिल्सच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला?
फोटो – २०१५ साली डोमोकोमेन चर्च मध्ये प्रार्थना करताना लोक फोटो- तरुण भारतीय. खासी लोकांनी ख्रिश्चन धर्म आपला कसा बनवला याची ही गोष्ट आहे. धर्मांतर करणे किंवा करवणे हा प्रकार फार पूर्वीपासून चालत आला आहे. औरंगजेबाने आमच्या नेतोजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून त्याचा महोमद कुलीखान केला. नंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. तसेच खासी लोकांच्या बाबतीत आहे. मेघालय आणि आसाम येथे राहणारे हे लोक. त्यांचा विश्वास आहे की ते त्या ७ कुटुंबांतून आले आहेत, जे पृथ्वी आणि स्वर्ग यातील झाड (रस्ता) कापलं गेलं तेव्हा इथेच राहिले. …
Read Moreगुंडगिरी आणि हिंसाचार करणाऱ्यांसाठी भारतीय लष्करात जागा नाही.
जे तरुण हिंसाचारात आणि जाळपोळीत सहभागी झाले असतील अशा तरुणांची लष्करात भरती नाही! केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात इंदोर रेल्वे मार्गावर विरोध दर्शवणारा तरुण वर्ग हा प्रसंग आहे १७ जून २०२२ चा. लष्कर प्रमुखांनी २ वर्षानंतर चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आता लष्कराचे काम आहे. केंद्र सरकारने अग्निवीरांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता निदान या प्रक्रियेत तरी राजकारण मध्ये आणू नये. अन्यथा लष्कराची तसेच देशाची मोठी हानी होईल.” लेप्ट. जनरल के हिमालय सिंग फॉर्मर जनरल ऑफिसर कमांडिंग १६ कॉर्पस. …
Read MoreNCERT अभ्यासक्रमातील पाठयपुस्तकातून मुस्लिम शासकांविषयी असलेल्या धड्याना वगळले.’ मुघल साम्राज्य’ या धड्याचे नावही बदलले.
अभ्यासक्रमातील पाठयपुस्तकात खूप चांगले बदल करण्यात आले आहेत. तुघलक, खिलजी, लोदी, आणि मुघल साम्राज्यकर्त्यांशी संबंधित सगळे धडे अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत. फोटो- १६ व्या शतकातील एक चित्र ज्यामध्ये मुघल सम्राट बाबर जेवताना दाखवला आहे. भारत सरकार NCERT च्या अभ्यासक्रमात बदल करणार आहे. भाजप पक्ष बऱ्याच काळापासून सांगत आला आहे की इतिहासामध्ये मुघल शासकांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले जात आहे. NCERT द्वारे केल्या जाणाऱ्या या बदलात बऱ्याच मुघल शासकांविषयी माहिती वगळली जाणार आहे. त्यांच्याबद्दल कमीत कमी माहिती कशी दिली जाईल हे बघितलं जाणार आहे. आमच्या प्रतिनिधीने सहावी ते बारावीच्या इतिहासाच्या सहा…
Read More