फोटो – सांगलिंगठाह वय वर्षे ६३ त्याच्या तळावरून हैमूळ गावावर लक्ष ठेवताना. लोकशाहीचे समर्थक असलेले गावकरी (सैनिक ) शस्त्रास्त्रे आणि अन्नासाठी भारतीय बांधवांवर अवलंबून आहेत. पाठीवर काडतुसांनी भरलेला पट्टा लावला आहे आणि हातात बंदूक धरलेली ती मुलगी लालहमान हैह तिचं बालपण तिच्याही नकळत हरवून बसली आहे. नुकतीच २ वर्षांपूर्वीच तर ती शाळेत शिकत होती. ज्या वयात मुली भातुकली किंवा तत्सम मुलींचे खेळ खेळतात. त्याच वयात तिला हातात बंदूक धरून लढाई साठी उभे राहावे लागत आहे. ती कधीकाळी मुलगी होती हे सांगणारी एकमेव खूण तिच्या शरीरावर उरली आहे. ती म्हणजे…
Read MoreCategory: संपादकीय
वर्ष २०२२ मधील सर्वात मोठे १० सुपरहिट चित्रपट.
हिंदी चित्रपट सृष्टीसाठीं वर्ष २०२२ हे संमिश्र प्रतिसादाचे ठरले. या वर्षात काही चित्रपटांना तिकीटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड बघायला मिळाला तर काही चित्रपट सपशेल आपटले. २०२१-२२ मध्ये कोविडमुळे सगळीकडेच शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यानंतर आता कुठे हिट चित्रपट प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. तीन बॉलीवूड चित्रपटांनी २ करोडचा व्यवसाय केला तर काही दाक्षिणात्य चित्रपट जोरदार चालले. २०२२ मधील सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांची यादी खालील प्रमाणे. KGF Chapter 2 (हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई ४३४.७० करोड या चित्रपटाने त्याच्या हिंदी आवृत्तीत भरपूर व्यवसाय केला. मूळ कन्नड भाषेतील चित्रपटापेक्षा हिंदी भाषेत या चित्रपटाने चांगली कमाई करून दाखवली.…
Read More१९९२ सालच्या अजमेर खटल्याविषयी थोडेसे…
युथ काँग्रेस अजमेर (राजस्थान) चा प्रमुख फारूक चिस्ती याने सोफीया उच्च माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचे अश्लील फोटो काढले होते. आणि त्या मुलीला धमकावले होते की जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो ते फोटो लोकांना दाखवेल. त्याची मागणी होती की फारूकला आणि त्याच्या टोळीला त्या मुलीने आणखी मुलींची ओळख करून द्यावी. आणि तसेच झाले. आणि मग सुरु झाली अजमेर मधील सामूहिक बलात्कारांची मालिका. या सगळ्यामध्ये एक गोष्ट सामायिक होती. ती म्हणजे बलात्कार करणारे मुस्लिम होते. आणि त्यांना बळी पडणाऱ्या होत्या हिंदू मुली. हळू हळू पीडित मुलींची संख्या १०० हुन अधिक…
Read Moreसार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील भारताचा भविष्यकाळ कसा असेल?
खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारी करण्यापासून ते हवामान बदलाची तयारी करण्यापर्यंत सरकार सर्वच करत आहे. आता उच्च दर्जाची आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सरकारने पुढील ३ गोष्टी सुद्धा करायला हव्यात. मागील बऱ्याच काळापासून भारतातील प्राथमिक आरोग्य क्षेत्राला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. जसे की आर्थिक पाठबळ नसल्याने कमी किंमतीचा वैद्यकीय माल वापरणे, प्राथमिक औषध उपचार वेळेवर न मिळू शकणे, नवीन डॉक्टरांची रोडावत चाललेली संख्या इत्यादी. पण गेल्या पाच वर्षात भारतात प्राथमिक उपचारांच्या दर्जात सुधारणा होत आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये सरकारने नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण बनवले. ज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात…
Read Moreगोळा नका करू !!! तुकडे करा….त्याचे !!!!
ब्रिटीशांनी अत्यंत हुशारीने ज्या व्यवस्था आपल्या देशावर लादल्या आहेत. त्यामध्ये न्यायव्यवस्था ही एक व्यवस्था आहे. भारतीय लोक मुळात चोर, दरोडेखोर आहेत त्यांना आम्ही आमच्या कायद्याच्या चौकटीत कसा न्याय देतो हे दाखवून कठोर शासन करायचे होते. तीच आजची आपली न्याय रचना आहे. रांझ्याच्या पाटलाने कुकर्म केले हे लक्षात येताच छत्रपती शिवाजी राजांनी त्याचा तात्काळ चौरंग (दोन्ही हातपाय तोडणे) करण्याचा आदेश दिला आणि पुढे स्वराज्यात असे कृत्य घडल्याचा दाखला नाही. कारण एखादे वाईट कृत्य घडल्या नंतर शासनकर्त्यावरचा आणि न्यायावरचा विश्वास टिकवायचा असेल आणि समाजात योग्य संदेश जायचा असेल तर न्यायपद्धती विलक्षण गतिमान…
Read Moreदर १० वर्षांनी आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करणे गरजेचे नाही.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आधारकार्डवरील माहिती दर १० वर्षांनी अद्ययावत करण्याविषयी कोणतेही पत्रक केंद्राकडे आलेले नाही. पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितले की नागरिकांची अचूक माहिती (IDR) मध्ये नोंदवण्यासाठी आधारकार्ड धारकांनी १० वर्षातून एकदा तरी सर्व कागदपत्रे खऱ्या माहितीसह आधार केंद्रात देणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची सर्व माहिती अद्ययावत राहील. आधारकार्ड बनवून झाल्यावर ठराविक वर्षांनी त्यातील माहिती अद्ययावत करणे हे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे असू शकेल. असे श्री राजीव रंजन, श्री दिनेश चंद्र यादव श्री संतोष कुमार यांचे म्हणणे होते. त्यावर मंत्र्यांनी आधार कार्डातील माहिती अद्ययावत करणेबाबत अजूनतरी कोणतीही सूचना केंद्राकडे…
Read Moreविज्ञान हा एक सांघिक खेळ आहे.
कोणत्याही कामाची एकत्रितपणे केलेली सुरुवात ही फायदेशीर असते. आणि दीर्घकाळ टिकून राहते. स्पर्धेमुळे तात्पुरता यशाचा आनंद मिळतो पण तो दीर्घकाळ टिकणारा नाही. त्यामुळे नेहमी अशा लोकासीबत काम करा ज्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुमच्यासोबत स्पर्धार्ण करायला नव्हे. फोटो पुरस्कार समारंभात भाषण करताना डॉ सुभाष बाबू सुभाष बाबू सायंटिफिक डायरेक्टर (इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलेन्स इन रिसर्च इंडिया प्रोग्रॅम)(ICMR NIRT ) यांना चैन्नई इथे ashford चे पदक देऊन गौरवण्यात आले. गेल्या ८२ वर्षात है प्रथमच एका भारतीयाला मिळाले आहे. याच बरोबर डॉ बाबू यांना २०२२ या वर्षीचा ‘Fellow of American society of…
Read Moreग्राहक तक्रार केंद्र – राज्य आयोगाकडे १.१२ लाख तर जिल्हा आयोगाकडे ४.२९ लाख खटले प्रलंबित आहेत.
आपल्या मराठीत एक म्हण आहे. उशिरा मिळालेला न्याय हा नाकारल्या सारखा असतो. दुर्दैवाने ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या बाबतीत ही म्हण खरी होताना दिसत आहे. कारण राज्य आयोग आणि आयोगाकडे लाखांहून जास्त खटले प्रलंबित आहेत. श्री खासदार मिधून रेड्डी यांनी संपूर्ण देशभरात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे किती खटले प्रलंबित आहेत? आणि ते खटले प्रलंबित असण्याची कारणे विचारली. या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या ग्राहक व्यवहार अन्न वितरण मंत्री अश्विनी चौबे म्हणाल्या की ग्राहक आयोगातील सभासदांच्या आणि प्रमुखांच्या जागा रिक्त आहेत. आणि खटल्यांच्या निकालाला वारंवार मिळणारी स्थगिती ही खटले प्रलंबित राहण्याची कारणे…
Read Moreश्रेष्ठ भारत !!
रा. स्व संघाचे सरचिटणीस श्री दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे की भारताच्या राजकारणात खूप बदल होत आहेत. यापुढेही होत राहतील. जसं की राजपथाचे नाव बदलून ’कर्तव्य पथ’ करण्यात आले. याचाच अर्थ आपला देश घराणेशाहीतून किंवा वसाहतवादाच्या परंपरेतून हळू हळू बाहेर येत आहे. सरचिटणीसांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुद्धा उल्लेख केला. एका व्याख्यान मालेचे उदघाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानाच्या कार्यालयातून येणाऱ्या पत्रांवर आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिनांक दिला जातो. राजपथाला आता कर्तव्य पथ म्हणून संबोधले जाणार असून पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला आहे असे होसबाळे यांनी सांगितले. ही…
Read Moreगेल्या ५ वर्षात ७.३६ लाख लोक रस्ते अपघातात ठार.
सरकारच्या मते सुमारे ७,३६,१२९ लोक हे साल २०१७ ते २०२१ मध्ये रस्ते अपघातात मारले गेले आहेत. अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही अपघातांमागची कारणे आहेत. या विषयावर लोकसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की एका वर्षातील रस्ते अपघाताचे प्रमाण बघण्यासाठी विविध राज्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यात अपघाताची मुख्य कारणे अतिवेगात गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, आणि गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे ही आहेत, त्याशिवाय चुकीच्या बाजूने गाडी चालवणे मार्गिकेची शिस्त न पाळणे, लाल सिग्नल तोडणे, हेलमेट सीटबेल्ट…
Read More