जेव्हा तुम्ही ठरवता की आपल्याला आरोग्य विमा पॉलिसी विकत घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करता. ज्यांना आर्थिक नियोजन चांगले जमते त्यांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा घेणे गरजेचे वाटते. आरोग्य विमा पॉलिसीचा महत्वाचा फायदा असा की पॉलिसी एकदा घेतली की त्यात ९०% हॉस्पिटलचा खर्च भागवता येतो. सध्या कॅशलेस विमा पॉलिसीचा बोलबाला आहे. जर तुमच्याकडे कॅशलेस विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला फक्त हॉस्पिटलची डिपॉझिट रक्कम भरावी लागते. बाकी सर्व खर्चाची काळजी इन्शुरन्स कंपनी घेते. पण आरोग्य विमा घेताना विचार करून घ्यायला हवा. विमा पॉलिसी त्यातील नियम अटी या व्यवस्थित…
Read MoreAuthor: mahanagari
मुक्त कृषी बाजारपेठेची चर्चा आणि मोदी सरकारचे निर्यात विषयक धोरण.
कदाचित मोदी सरकारला असे वाटत आहे की या अशा विचित्र पद्धतीच्या धोरणामुळे त्यांना जागतिक कृषी बाजारपेठेतील व्यवहारांवर ताबा मिळवता येईल. आणि कोणतेही निर्णय शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास न देता एका रात्रीत बदलता येतील. मे महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा युरोप दौऱ्यावर गेले होते. तेव्हा डेन्मार्क मध्ये त्यांनी एक मोठे विधान केले. “आता आम्ही (भारत) जगाला भुकेला राहू देणार नाही.” आम्ही त्यांना अन्नधान्य पुरवू. १० दिवसाच्या आत भारताने गव्हाची निर्यात थांबवली. १२ मे रोजी महागाईचा आकडा हा आठ वर्षातील सर्वात मोठा होता. त्यामुळे सरकारवर दडपण आले कारण नुकतेच सरकारने…
Read Moreअननसाचा गर स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी प्रभावी आहे.
एका उंदरावर केलेल्या प्रयोगाअंती हे सिद्ध झाले आहे की अननसाचा गर हा स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांसाठी खात्रीलायक इलाज आहे. स्मृती भ्रंश हा मेंदूशी संबंधित आजार आहे. ज्यात विस्मरण होते. मेंदूतील अमीबाईड बीटा हे प्रोटीन वाढल्याने हा आजार होतो. हा आजार झालेल्या रुग्णांना गोष्टी लक्षात राहत नाहीत. हा आजार जर मोठ्या प्रमाणात झाला तर रुग्णांना भ्रम होऊ शकतो. आणि दैनंदिन गोष्टी करण्यात अडथळा येऊ शकतो. फगवारा पंजाब येथील एका महाविद्यालयाने केलेल्या संशोधनानुसार आताची उपलब्ध औषधे स्मृतीभ्रंशावर प्रभावी नाहीत. निरो टॅक्सिकोलॉजी या मध्ये दिलेल्या संशोधनानुसार ब्रोमोलिनचे योग्य प्रमाण हा स्मृतिभ्रंशावर योग्य इलाज ठरू शकतो.…
Read Moreलुटारूंनी ओला टॅक्सी लुटून प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात सोडले.
जेव्हा ओलाने बाहेरगावी जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरु केली. तेव्हा सर्वांना वाटले होते की हा प्रवास सुरक्षित आणि जलद असेल. पण सध्याची परिस्थिती यापेक्षा अगदी उलट आणि घाबरवणारी आहे. ओला टॅक्सीने कर्नाटकमध्ये प्रवासासाठी निघालेल्या Vks नावाच्या व्यक्तीने लांबलचक टि्वट केले आहे. मी मैसूरला परत येण्यासाठी आउटस्टेशन ओला आरक्षित केली. प्रवास सुरु होऊन अर्धा तास झाला असेल नसेल. काही गुंडांनी येऊन आमचा रस्ता अडवला. त्यांनी ड्रायव्हरला धमकावून त्याची मागची थकबाकी ताबडतोब द्यायला सांगितली. नाहीतर गाडीचे नुकसान करू अशी धमकी दिली. त्यांनी आम्हाला सुद्धा उतरायला सांगितले. आणि दुसरी टॅक्सी पकडायला सांगितले. या…
Read Moreघरांची वाढती मागणी आणि व्याजाचे वाढते दर यामुळे घरांच्या किंमती वाढत आहेत.
घरांच्या मागणीमध्ये अचानक झालेली वाढ ही अजून काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना ही मागणी अजून ५% ते १०% नी वाढण्याची शक्यता आहे. महागाईमुळे घरासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळेच प्रमुख ६ शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा घरांच्या किंमती वाढवायला लागणार आहेत. काहींनी तर प्रत्येक तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये २% वाढ करायला सुरुवात केली आहे. ही वाढ अशीच चालू राहण्याची शक्यता आहे. कच्या मालाच्या वाढणाऱ्या किमतींबरोबरच जमिनीच्या किंमतीही वाढत आहेत. एवढं सगळं असून सुद्धा घरांच्या मागणीमध्ये वाढ होईल असे मत व्यक्त केले जात आहे. घरांच्या मागणीत अचानक…
Read Moreआम्ही वीर झुंजार
संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही वीर झुंजार, करू जामदाढे मार, थापटिले भार मोड, झाला दोषांचा अर्थ-आम्ही या हरीचे वीर योद्धे आहोत. आम्ही मृत्युवरही हल्ला करून त्यास परतवून लावले आहे. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सैन्याच्या जवानांना त्यांच्या कामगिरीबद्दल शौर्य चक्र देऊन सन्मानित केले आहे. ते पाहिले आणि माझ्या डोळ्यासमोर तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ओळी येऊ लागल्या. हा कार्यक्रम १० मे २०२२ रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेल्या सैनिकांचे फोटो खालील प्रमाणे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद मेजर श्री रवीकुमार चौधरी यांना शौर्यचक्र देताना.…
Read Moreअयोध्या ः शिवसेना नेत्यांचा कपटीपणा! तेव्हा आणि आता…
शिवसेनेचे आमदार श्री संजय राऊत हे शिवसेनेने बाबरी मशीद फक्त १७ मिनिटात पाडली असे सांगून कपटीपणा करतायत. अगदी तसाच ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी स्व बाळासाहेब ठाकऱ्यांनी (ते हयात) असताना मशीद पाडल्याचं श्रेय स्वतःकडे घेऊन केला होता. – सुजाता आनंद. हे मी माझ्या सम्राट नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे. शिवसेनेमुळे मुंबई कशी बदलली? पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांच्यासाठी परत सांगते. तरुणपणी मी नॅशनल वायर या वृत्तपत्रासाठी काम करत होते. रविवारचा ओव्हर टाईम लागला होता. ६ डिसेंबर १९९२ ला आमच्या संपादकांनी मला सांगितलं अयोध्येतून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेव. दंगली होतील असा त्यांचा…
Read Moreखाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे राज्याचे उत्पन्न कसे धोक्यात येते.
१ एप्रिल रोजी IFB ऍग्रो इंदूस्ट्रीज लिमिटेडने स्टॉक एक्सचेन्जला सांगितले की त्यांच्या मॅनेजिंग कमिटी ने २२-२३ या वर्षासाठी इलेकशन बॉण्ड्स मध्ये ४० कोटी गुंतवले आहेत. २०-२१ या वर्षासाठी त्यांचा नफा ४७ कोटी रुपये होता. पण मग प्रश्न हा आहे की ते राजकीय प्क्षांना एवढे पैसे का देत आहेत. यावरून असे दिसते की राज्याच्या महसूल विभागाकडून होणारी छळवणूक थांबवण्यासाठी ते बॉण्ड्स द्वारे इलेकशन पैसे देत आहेत. खरतर हे स्वाभाविक आहे. कारण कंपनीच्या कागदपत्रात स्पष्टपणे महसुलाबाबतच्या कंपनीच्या समस्या असे लिहिले आहे. आणि यात काही कंपनीच्या आतील राजकारणाचाही भाग असू शकतो. अशा समस्या…
Read Moreमाझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे.
माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे. कलेला कोणताही धर्म नसतो. एक कलाकार हा कलाकारच असतो. कोणतीही कला लोकांसमोर अशी सादर करावी की लोकांनी निःशब्द व्हायला हवं. १९५० च्या उत्तरार्धात ११ वर्षांच्या हैदर अली यांनी कथकली संगीत शिकण्यासाठी केरळ येथील कला मंडलम मध्ये प्रवेश घेतला. कथकली ही कला मंदिरात सादर केली जाते. हैदर अलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने नृत्यासाठी शिकवणी लावणे हे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. असे म्हणतात की एका हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबाने त्यांच्या शिकवणीचे पैसे भरले होते. श्री हैदर अली हे मुस्लिम असल्याने मंदिरात आपली कला…
Read Moreसहकारी ते सैन्यदल प्रमुख… श्री मनोज पांडे
प्रशिक्षणादरम्यान बॉम्बे सॅपर्स च्या प्रत्येक नियमांचे पालन करणारे सहकारी ते सैन्यदल प्रमुख हा त्यांचा प्रवास पाहिला की माझा उर अभिमानाने भरून येतो. त्यांची मेहनत, कोणतंही काम करण्याची तयारी कौतुकास्पद आहे. कर्नल के थामया त्यांचे सहकारी जनरल श्री मनोज पांडे यांच्या विषयी बोलत होते. श्री मनोज पांडे यांना १ मे रोजी सैन्याचे प्रमुख म्हणून पदभार दिला गेला. शुक्रवार १३ जानेवारी १९८३ रोजी आम्ही नवीन भरती झालेले १६ ऑफिसर बॉम्बे इंजिनीरिंग ग्रुप किरकी (आता खडकी) येथे भारताच्या विविध भागातून येऊन पोचलो. २१ दिवसांची सक्तीची सुट्टी नुकतीच संपली होती. महिन्याभरापूर्वी भारतीय मिलिटरी अकादमी…
Read More